देगलूर (प्रतिनिधी)
देगलूर तालुक्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून पार पडला. या सोहळ्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी देगलूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी उपनगराध्यक्ष मधुकरराव नारलावार, माजी उपनगराध्यक्ष वंदनाताई कांबळे, माजी उपनगराध्यक्ष विवेक केरुरकर, माजी सभापती आसिफ पटेल रावणगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मल्लनरेडी चिंतलवार यांच्यासह देगलूर तालुक्यातील अनेक माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती व स्थानिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.
कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात झाले असून या प्रवेशामुळे देगलूर-बिलोली-मुखेड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद आणखी बळकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या सोहळ्यास माजी मंत्री नवाब मलिक, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, शहर जिल्हाध्यक्ष माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार सुभाषराव साबणे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैशालीताई चव्हाण, प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, वसंत सुगावे, देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिकेत पाटील राजूरकर, उपसभापती पंकज देशमुख आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रवेशादरम्यान माजी नगराध्यक्षा उज्वलाताई पदमवार, सुनीताताई मैलागिरे, संजय चिन्नमवार, मीनाक्षीताई कांबळे, विश्वनाथराव पवार, लक्ष्मण उल्लेवार, अनुराधाताई जोशी, विजयामालाताई टेकाळे, सादक महमूद, शेख पाशा शेख शादुलासाब, शेख आयुब कुरेशी, अनिल तोताडे, शैलेश चव्हाण, नंदकिशोर माधव फुलारी, अनिल कोंडेकर, सुमित कांबळे, साई गंदपवार, सय्यद मोहियोदिन, अॅड. रजाक, सुदाम देशमुख, गजू कांबळे, विकास तोटावाड, शफीभाई, हबीबभाई, गंगाधर बत्तुलवार, मोईनभाई, सोहेल चाऊस, खलील मलिक, सुजित सूर्यवंशी, सुरज कांबळे, ओमकार उल्लेवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या मोठ्या प्रमाणातील पक्षप्रवेशामुळे देगलूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक बळकट झाले असून, आगामी स्थानिक स्वराज्य व विधानसभा निवडणुकांमध्ये या नव्या उमेदाने पक्षाच्या वाढीस गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

