किनगाव ( प्रा राहुल गायकवाड)
किनगाव ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रेचे यावर्षी पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे . पादुकाचे पुजन करून पुष्पवृष्टी करून शनिवारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे .
किनगाव येथून वीरशैव मठ संस्थान प्रस्थान शनिवारी ( दि १ नोव्हें २५ ) रोजी सकाळी ६वा. होणार असून श्री क्षेत्र कपिलधार येथे बुधवार (दि ५ नोव्हें २५ ) रोजी पोहोचणार आहे.या दिंडीच श्री क्षेत्र मरळसिद्ध, पूस, लोखंडी सावरगाव, केज, खडी केंद्र व शेवटी कपिलधार या ठिकाणी पोहचणार आहे . या पायी दिंडीत भाविकांना सकाळी आणि संध्याकाळी अन्नदान अन्नदात्याच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यामध्ये जगन्नाथ सिद्धेश्वरे, दीपक चावरे, नारायण सावरगावे, महादेव नकाते, शिवानंद शिलगिरे, अशोक कल्याणे, चंद्रकांत शिलगिरे, राजकुमार चावरे, विशाल नेमाडे आणि विनायक बोडके इत्यादी अन्नदाते अन्नदान करणार आहेत .या दिंडीत कीर्तनकार अण्णाराव होनराव, विणेकरी बाबुराव नकाते, गायक शिवानंद शिलगिरे, मारुती तोंडारे ,वादक बालाजी होनराव ,ओमकार स्वामी , दिंडीमध्ये पाण्याची व्यवस्था शिवशंकर बावगे, सुभाष गुट्टे यांच्यातर्फे करण्यात येणार आहे .
या दिंडीची नियोजन समस्त वीरशैव समाज किनगाव यांनी केले आहे. पदयात्रेत भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

