कंधार ; प्रतिनिधी
भीमगड प्रभाग क्र. 1 (अ) मधील नागरिकांचा एकच सवाल — “मागील कार्यकाळात झालेला विकास कुठे आहे?” प्रभागात ना रस्ते आहेत, ना नाल्या, तर काही ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. या बिकट परिस्थितीवर पत्रकार मयुर कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रशासन व माजी लोकप्रतिनिधींना जाब विचारला.
या दुर्लक्षित प्रभागाला नवसंजीवनी देण्यासाठी आता स्थानिक कन्या स्वाती (व्यवहारे) कांबळे रणांगणात उतरल्या आहेत. बालपणापासून 26-27 वर्षे या परिसरातीलच रस्त्यांवरून संघर्ष करत आलेल्या स्वाती ताईंचे नागरिकांशी घट्ट नाते आहे. “ज्यांनी या रस्त्यांवर चालत आयुष्य घालवले, त्यांनाच या प्रभागाच्या वेदना माहीत आहेत,” असे सांगत त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी लढण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
स्वाती (व्यवहारे) कांबळे यांनी भीमगडचा चेहरामोहरा बदलण्याचे वचन देत, नागरिकांना आवाहन केले आहे —
“मायबाप जनता, तुमच्या लेकीला एक संधी द्या; भीमगडचा विकास न झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.”प्रभागात आता नव्या नेतृत्वाकडून बदलाची अपेक्षा वाढली असून, नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


