अहमदपूर ( प्रतिनिधी) डॉ.मिर्झा एक्स्प्रेस , प्रसिद्ध साहित्यिक डॉ.मिर्झा रफी बेग यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना काव्य श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भव्य ऑनलाईन कविसंमेलन आयोजित केले होते.
यात महाराष्ट्रातून शंभर कवींना निमंत्रित केले होते.हिंगोली जिल्ह्यात नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे ऑनलाईन कविसंमेलन घेवून डॉ.मिर्झा बेग यांना नामवंत कवींच्या शंभर कवींच्या कवितेची जणू काही सलामी देवून श्रद्धांजली अर्पण केली.या कविसंमेनाला अध्यक्षा म्हणून पश्चिम विभाग प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक ,सामाजिक कार्यकर्त्या सौ.निशा विसपुते उपस्थित होत्या तर उद्दघाटक म्हणून अक्षरोदय साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.सदानंद सपकाळे उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे म्हणून रानकवी राजकुमार नायक,यमुनाई प्रकाशनचे भारतकुमार लाड,पत्रकार तथा प्रसिद्ध कवी विजय गुंडेकर,साहित्यिक सचिन पाटील रायगड, शिवदास कराड लातूर,उमाकांत काळे अकोला उपस्थित होते.या कविसंमेलनाची सुरुवात बेग मिर्झा यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली.यावेळी अनेक मान्यवर साहित्यिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.अनेकांना अश्रू अनावर झाले.अध्यक्षा निशा विसपुते यांनी त्यांचे अनेक प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा उजाळा दिला तर सौ. सिंधूताई दहिफळे यांनी त्यांच्या सोबत सात ते आठ कार्यक्रम लाईव्ह केले होते. त्यामुळे त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. उद्दघाटक सदानंद सपकाळे यांनी त्यांची कविता गावून कविसंमेलनाचे उद्दघाटन केले.
या कविसंमेलनात सौ.अश्विनी देशमुख महाड,गजानन उफाडे नाशिक,वैशाली कांबळे रायगड, लता गुठ्ठे मुंबई,कृष्णा वानखेडे पुणे, सोनाली बेले,गोकुळ गायकवाड, मुरहरी पारकर,पवन कच्छवे, भगवान आमलापुरे ( तिघेही अहमदपूर) ,अनिकेत देशमुख वाशिम, साईनाथ रहाटकर आदी सह महाराष्ट्रातल्या शंभर कवी,कवयीत्रीनी एकापेक्षा एक कविता सादर करून डॉ.मिर्झा बेग यांना शंभर कवितेची सलामी कविता गावून दिली. या कविसंमेलनाचे सूत्रसंचलन अक्षरोदय साहित्य मंडळाच्या राज्य अध्यक्षा सौ. सिंधूताई दहिफळे यांनी केले, प्रास्ताविक श्री. चंद्रकांत चव्हाण यांनी केले तर आभार कोषाध्यक्षा उषाताई ठाकूर यांनी मानले.

