एखाद्या भौगोलिक स्थळाची माहिती मिळवण्यासाठी आपणांस भूगोल विषयासाठी क्षेत्रभेट ही एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. आपण ज्या ठिकाणी क्षेत्रभेटी साठी जात आहोत. तेथील भौगोलिक घटक व भौगोलिक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव आपणांस घेता येतो. तेथील संकल्पना ही समजून घेता येतात. मानव आणि पर्यावरण यांचा सहसंबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्र भेटी उपयुक्त ठरते. त्यामुळेच क्षेत्रभेटीचा विषय, ठिकाण,तिथे जाण्यासाठी असणारा मार्ग, हवामान लोकसंख्या, वनस्पती ,मृदा, अक्षांश ,रेखांश, प्राणी, प्राकृतिक घटक, चढ-उतार ,दर्या खोऱ्या या सर्व गोष्टीचे निरीक्षण क्षेत्रभेटी मुळे केले जाते.त्यासाठीच भौगोलिक दृष्ट्या भूगोल हा विषय अतिशय महत्त्वाचा विषय आहे.ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेट करणार आहोत. तेथे आपल्या सोबत नोंदवही, कॅमेरा, पेन,पेन्सिल, कापडी पिशवी सोबत असणे गरजेचे आहे. त्यासाठी आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील नैसर्गिक चमत्कार असलेले रांजण खळगे यांचा सखोल अभ्यास करणार आहोत.
त्या ठिकाणचे हवामान,पर्वत रांगा,नद्या,पठारे, भूरूपे, मृदेचे प्रकार, नकाशातील स्थान, प्राकृतिक वैशिष्ट्ये यांची सखोल माहिती असणं अतिशय गरजेचे आहे. तत्पूर्वी अहिल्यानगरची काही आध्यात्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे.त्या दृष्टीने ….
महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर हा ओळखला जातो. जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक स्थळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ चोंडी आहे.आध्यात्मिक दृष्टीने नेवासे. शनिशिंगणापूर, शिर्डी, सिद्धटेक तसेच गोदावरी, प्रवरा, मुळा, घोड ,सीना,अडुळा, म्हाळुंगी इत्यादी पवित्र नद्यांचे पाणी खळखळत वाहत असते.भंडारदरा, मुळा, विसापूर तलाव(नैसर्गिक तलाव) म्हणून ओळखला जातो. घाटघर धरण ही महत्त्वाची धरणे शेतीला पाण्याचा विसर्ग सोडण्या साठी महत्त्वाची मानली जातात. राळेगणसिद्धी व हिवरे बाजार या ठिकाणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे साहेब व पद्मश्री पोपटराव पवारजी साहेब यांनी महाराष्ट्र राज्याला मार्गदर्शन करणारी दोन आदर्श गावे सर्व सोयीयुक्त तयार केली आहेत.
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना आपल्या जिल्ह्यात प्रवरानगर येथे आहे. मेहेराबाद,सलाबतखानाची कबर,चांदबिबीचा महाल हेही आपल्या जिल्ह्यात आहेत. कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, रतनगड ,बालाघाट पठार ही भौगोलिक दृष्टीने अतिशय महत्वाची ठिकाणे आहेत. गोदावरी व भीमा नदीच्या खोऱ्यात वसलेला हा जिल्हा आहे.
अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्यात ‘भारताचा शोध’ हा ग्रंथ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांनी येथेच लिहिला.ऐतिहासिक स्थळ टोके. शनिशिंगणापूर येथे प्रत्येक
अमावस्यला भाविकांचे अलोट गर्दी असते. पारनेर तालुका हा शूरवीरांचा तालुका आहे. सेनापती बापट हे येथीलच आहेत. तसेच पाराशर ऋषींच्या नावावरून पारनेर हे नाव मिळाले आहे.अशा या पारनेर तालुक्यात निघोज या ठिकाणी हजारो वर्षाच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे वाहत्या पाण्याच्या प्रवाहाने बेसाल्ट खडकांनी काळाकुट्ट खडक तयार झाला आहे.या खळग्यांची आपण निर्मिती कशी झाली. याचां अभ्यास आपण करणार आहोत.
हे कुकडी नदीचे पात्र आहे.या नदीच्या कठीण खडकांवर पाण्याच्या प्रवाहाने वाहून आलेले माती,दगड, गोटे गोल गोल फिरून हे रांजणाच्या आकाराचे खड्डे तयार झाले आहेत. तुम्हाला हा निसर्गाचा नैसर्गिक अद्भुत ठेवा पाहायचा असेल तर ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत जाऊन ते पाहू शकता. परिसरातील अनेक शैक्षणिक सहली या बेसाल्ट खडकाचा खरोखर आनंद घेतात. जेणेकरून भूगोल हा विषय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने क्षेत्रभेट करण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन पाहण्याचा असतो. बऱ्याच शैक्षणिक सहली या ठिकाणी येऊन भूगोलचा अभ्यास करून जातात. आणि त्याचा विद्यार्थ्यांना खरोखर रांजणखळगे पाहून निसर्गाचा अद्भुत चमत्कार कळतो. मी माझ्या कार्तिक कुमार विठ्ठल बरसमवाड व राजकुमार विठ्ठल बरसमवाड या दोन मुलांना आणि माझे परममित्र आदरणीय ग्रंथपाल न्यू इंग्लिश स्कूल पारनेर येथील गायकवाड पोपट संपत यांना रांजणखळगे पाहण्यासाठी घेऊन गेलो. तेथील काळा कुळकुळीत खडक आम्हांला पाहावयास मिळाला. कोणत्या रांजणातून पाणी झिरपून कोणत्या राजणांत जात आहे.
याचे उत्तर आम्हाला सापडले नाही. कारण तेवढी ही रुंद रांजणखळग्याची दरी आहे.देशाच्या कानाकोपऱ्यातून ही रांजणखळगे पाहण्यासाठी पर्यटक येथे अतिशय आनंदाने येत असतात.अनेक स्थलांतरीत पक्षी येथे विश्रांती घेतात.अन्न भक्षण करण्यासाठी रांजणखळग्यांच्या फटीतील किड्यांचा वापर केला जातो.वरच्या बाजूस कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला आहे. बारा महिने त्या बंधार्यात पाणी साचून राहते.त्यामुळे पाणी सारखे झिरपून रांजणखळग्यामध्ये येते.
व एकापाठोपाठ हे रांजणखळगे भरतात. त्यामुळे हा नैसर्गिक अद्भुत चमत्कार आहे. असे बोलले जाते. ते प्रत्यक्ष पाहण्याचा योग आम्हा सर्वांना आला.रांजण खळगे पाहताना पर्यटकांना विशेष सूचना देण्यात आलेल्या आहे. पाण्याने भरलेल्या कुंडाजवळ कोणीही जाऊ नये. स्नान करू नये. छोट्या मुलांना सांभाळून कुंड पाहण्यास सांगावे. आणखी एक विशेष बाब म्हणजे भौगोलिक दृष्ट्या एका तीरावर अहमदनगर जिल्हा व दुसऱ्या तीरावर पुणे जिल्हा शिरूर तालुका आहे. दोन्हीही जिल्ह्याची सीमारेषा या रांजणखळग्यावर आहे. असे ठिकाण शोधून सुद्धा सापडत नाहीत.हे मात्र विशेष रांजणखळगे हे वेगाने होणाऱ्या पाण्यामुळे तयार होतात.म्हणूनच याला निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणतात.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद झालेली आहे. रांजणखळगे पाहण्यासाठी मोठा उंच पुल पर्यटकांसाठी उभारला आहे. तो दोन जिल्ह्यांना जोडणारा जमिनीवरील एक आकर्षक पूल आहे. दुसरा लोखंडी झुलता पूल आहे. त्यामुळे नदीकिना-यावरील दोन्ही मंदिरांना तो जोडतो.
अशी एकूण दोन पूले आहेत.
त्या पुलाच्या आजूबाजूला रामकुंड, सीताकुंड तिथे उभारलेले आहेत. आणि मळगंगा देवीचे स्वयंभू मंदिराची स्थापना तेथे केलेली आहे. त्यामुळे पर्यटक देवदर्शन करतात आणि भौगोलिक सहलीचा आनंदही घेतात. फार मोठी यात्रा येथे भरते.
त्या नदीपात्रातून घागर काढली जाते. अशा अनेक आख्यायिका तेथील जुने जाणते लोक सांगतात.अहमदनगर भाळवणी जामगाव पारनेरहुन निघोजला जाता येते. तसेच पुणे- वाघोली, रांजणगाव शिरूर वरूनही निघोजला येता येते. म्हणून हा नैसर्गिक चमत्कार आपण पाहावा. अशी रांजणखळगे आशिया खंडामधील विशेष असणारा निघोज हे अतिशय महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. जेणेकरून आपल्या दृष्टीने ही भौगोलिकता अतिशय चमत्कारिक आहे.आजच्या तरुण पिढीने निसर्गाने दिलेले वेगवेगळे अद्भूत चमत्कार सांभाळून ठेवावेत.
त्याची काळजी घ्यावी. त्याचे संवर्धन व जतन करावे.
आज आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. पर्यटनासाठी आलेले पर्यटक तिथेच घाण करतात. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या रांजण खळग्यात फेकून देतात. वास्तू विद्रूप करणे. तेथील काही महत्त्वाचे सामान उचलून नेणे. अशामुळे नैसर्गिक वास्तू व वस्तू टिकून राहत नाहीत. जेणेकरून आपण याची काळजी घेतल्यास आपला नैसर्गिक अमूल्य ठेवा, पुढील पिढीला पाहता येतो. भूगोल अभ्यासाच्या दृष्टीने आलेल्या व्यक्तींना माहिती मिळविण्यासाठी तिथे भौगोलिक माहितीचे बोर्ड असावेत. त्या बोर्डावर इतर दुसरे कोणतेही बॅनर लावू नयेत. जेणेकरून मराठी व इंग्रजी भाषे मधून फलक मोठ्या अक्षरात लिहिलेले असावेत. आणि त्या परिसरात भौगोलिक माहिती सांगणारे मार्गदर्शक व्यक्ती असावेत. महाराष्ट्राला 7517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. अनेक नद्या एकत्रित येऊन समुद्राला मिळतात.त्यासाठी नद्यांच्या पात्रात कोणीही अतिक्रमण करू नये. नद्यांची जागा त्यांचं कार्यक्षेत्र आबाधित राहू द्यावे.सध्याच्या काळात नद्यांच्या खोऱ्यात घरे बांधून पावसाळ्यात पर्जन्यमान झाल्यानंतर ती घरे वाहून जातात मग जीवित हानी व आर्थिक नुकसान दोन्ही होतात. परत शासनाला मदत मागण्या साठी रस्ता रोको आंदोलन केले जाते. हे योग्य आहे का? याचा विचार तेथील लोकांनी करावा.
म्हणून नदीकाठी वरील मानवी वस्तीला धोका निर्माण होतो. रांजण खळगे पाहण्यासाठी वेळ ठरवून दिला जावे. रात्री अपरात्री पर्यटकना आतमध्ये सोडू नये. रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकाकडून निमित्त मात्र फी घ्यावी. म्हणजे जेणेकरून त्यांचे महत्त्व अबाधित राहील. फुकटचे महत्त्व कोणालाही राहत नाही. असे माझे वैयक्तिक मत आहे. पर्यटकांसाठी येथे राहण्याची सोय केली जावी. या ठिकाणचा विकास कसा करता येईल. यावरही विचार मंथन व्हावे. दरवर्षी या रांजणखळग्यांच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी एखादा दिन निवडला जावा. येथे रांजणखळग्याची माहिती पर्यटकांना देण्यासाठी पुस्तिका असावी. तेव्हा पर्यटक स्थळ आणखी नावारूपाला येईल. जास्तीत जास्त पर्यटक या ठिकाणाला भेट देतील
त्यातून परकीय चलन मिळेल. आणि बेरोजगारांना येथे आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होता येईल. वरील सर्व मुद्दे माझे वैयक्तिक मत आहेत.मी भूगोल विषयाचा अभ्यास करण्यासाठी या पर्यटन स्थळाला दि.18 एप्रिल रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत भेट दिली आहे. प्रत्यक्ष पाहून तेथील वर्णन मी केले आहे.
अशा प्रकारे पारनेर तालुक्यातील निघोज येथील रांजणखळगे अतिशय सुंदर आहेत. त्याचे जतन व संवर्धन करावे. थोड्या प्रमाणात काही सुविधा आहेत. परंतु आणखी थोड्या वाढवाव्यात.
एवढेच भूगोल अभ्यासक म्हणून मला वाटते.*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव*
*सदस्य- निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ. अहिल्यानगर*

