कंधार:-(दिगांबर वाघमारे )
शहरात ठिकठिकाणी गोळा होणारा कचरा उघड्यावर जाळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.यामुळे मोठ्या प्रमाणात धूर व विषारी वायू हवेत मिसळत असून, गंभीर वायू प्रदूषण निर्माण झाले आहे. या वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने कचरा न जाळता त्याची शास्त्रीय व पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावावी,अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार आणि यांनी समाजमाध्यमांवरुन कंधार नगरपरिषद प्रशासनाला केली आहे.
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये आणि डम्पिंग ग्राउंडवर सुका व ओला कचरा वेगळा न करता सरसकट जाळला जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत.कंधार लोहा मुख्य रस्त्यावर नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करून घनकचरा प्रकल्प उभ केल आहे पण शहरातील वैद्यकीय ,औद्योगिक व घरगुती जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही, दररोज संकलित केलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक, रबर आणि इतर घातक घटक जळाल्यामुळे हवेमध्ये विषारी रसायने पसरतात, ज्यामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या प्रवाशांना व सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांना, लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांना या जाळलावुन विल्हेवाट केलेल्या कचऱ्याचा धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे.
कचरा जाळण्यावर बंदी उघड्यावर किंवा डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावीओल्या व सुक्या कचऱ्याचे घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प राबवावा प्रदूषण नियंत्रण नियमांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे नगरपरिषदेने काटेकोरपणे पालन करावे नगरपरिषदेने तातडीने या समस्येची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता नगरपरिषद कंधारने कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थीत लावण्यासाठी ‘वेस्ट-टू-एनर्जी’ (कचऱ्यापासून ऊर्जा) किंवा खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करावेत, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व गंगाप्रसाद यन्नावार यांनी व्यक्त केली आहे.

