कंधार :
अगदी प्राचीन काळापासून मला अन्यन्य साधारण महत्त्व आहे. पुराण,वेद, ऐतिहासिक ग्रंथ, बखर व विविध धार्मिक ग्रंथाची व साहित्यिकांनी लिहिलेली ग्रंथ संपदा निर्मिती होतांना,गुरु समोर शिक्षणाचे धडे गिरवतांना माझे अस्तित्व सर्वांना मान्य करावेच लागते.मी शाई या अन्नावर जगुन अनेक पांढरे करकरीत कोरे कागद बोलके करतांना लिहिणाऱ्यांच्या मनातील विचार आळस न करता लिहिणाऱ्यांच्या मनावर मला कधीही तयार राहावे लागल्यामुळे मी आहे स्वयंस्फूर्त माझे लिहिण्याचे न थकता कार्य करत राहते!मी माझ्या कार्यात प्रामाणिक आहेच पण मला आदेश देवून लिहिणाऱ्यावर माझी नैतिकता अवलंबून आहे.माझा वापर करून इतिहासकारांनी भुतपुर्व घटनांचा इतिहास लिहिण्यासाठी वापर करतांना सत्य का असत्य याचा विचार करण्याची संधी मला मुळीच मिळाली नाही.पण लिहिण्याचे काम इमाने-इतबारे केली आहे.त्यामुळेच इतिहास लिहितांनी मी साक्षीला आहे.याचा मला खरच अभिमान वाटतो.महाभारत असो का रामायण ही महाकाव्य लिहितांना व्यास मुनी असोत का? महर्षी वाल्मिक ऋषी असो त्या दोन महान ग्रंथ लेखकांनी माझ्या उपयोग करुन ही दोनही महाकाव्य अजरामर झाली आहेत.माझ्या वापरातून जे माझ्यातुन लिहिले गेलेले शब्द तलवारीच्या पात्या पेक्षाही धारधार असतात.एवढेच पुर्वी जगात राजा-महाराजांचा बोलबाला होता.प्रत्येक राजांच्या दरबारात मला कार्यमग्न राहतांना माझा वापर करण्यासाठी दिवाणजी मानधनावर काम करत असत.
राज घराण्यापुर्वी चर्मपत्रावर लेखन करणाऱ्या मला
रीड असे नाव देवून वापर करण्यात येत होता.ऑगस्ट १६६३ मध्ये सॅम्युअल यांनी डायरी मध्ये शाई वाहणारी रौप्य धातु पासून माझी निर्मिती केली.१७७२ मध्ये माझी धातुने बनल्याची जाहिरात करण्यात आली.१८११ मध्ये तर ब्रायन डाॅनकिनने विक्रीचे पेंटेट घेतले.३० ऑगस्ट १८७३ रोजी भाद्रपद शु.त्रयोदशीला सांस्कृतिक राजधानी पुणे येथील शनिवार वाड्यात जे घडले त्यामुळेच मराठेशाही हादरली.अधिकारी पदावर असलेल्या १८ वर्षीय नारायणराव पेशव्यांना गारद्यांनी मारले. या कृत्याची जबाबदारी नारायणराव पेशव्यांचे काका रघुनाथराव म्हणजे राघोबादादा यांचे कडे जाते.न्यायमूर्ती
रामशास्त्री यांनी रघुनाथदादा यांना देहांत प्रायश्चित्त घेतले नाही.पण रघुनाथ दादांनी लिहिलेल्या पत्रात रघुनाथरावाची पत्नी सौ.आनंदीबाई यांनी ऐनवेळेस “ध” च्या जागी “मा” केले गेले.त्यामुळेच गारद्यांनी नारायणराव पेशवे यांना न धरता मारुन टाकले.ही खंत आजही मला बेचैन करते आहे.गुन्हेगार कोणीही असेल पण माझा वापर केल्याने मी आजही यातनाग्रस्त आहे.
३० आक्टोंबर १८८८ रोजी बाॅलच्या मदतीने मी उमटत गेले.याचे पेटेंट जाॅन जे लाऊड यांना देण्यात आले.नंतर हंगेरियन वृत्तपत्र संपादक लाजलो बेरी यांचे बंधु रसायनशास्त्रज्ञाच्या मदतीने माझ्या नविन प्रकारच्या रचनेची करण्यास सुरुवात झाली.माझी सुरुवात पक्षाच्या पंखापासून रोलर बाॅल,फाऊंटन,टिप अन् मार्कर,ब्रश,स्टाईलिस आणि इतर सर्व प्रकाराने मी ओळखले जाते.त्या कालखंडात नंतर माझ्यात अनेक बदल होत गेले.कट्नीब, कॅलिग्राफी,स्केचसाठी असे नविन प्रकारात मला येता आले.भारतीय संविधान का प्रधान ,शिल्पकार, वास्तुकार निर्मितीकार,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व त्यांच्या सहकार्याने भारताला संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी प्रदान केले.तर२६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधान प्रत्यक्ष कार्यान्वित झाले. भारतीय संविधान ग्रंथराज लिहितांना मला २५४ शाईची दऊत अन् आम्ही ३०३ जनांनी मिळून संविधान लेखन करण्यास सहा महिने लागली.संविधान हिंदी व इंग्रजी भाषेत नेहरुजींच्या इच्छे खातर लिहिले गेले.त्यानंतर कॅलिग्राफीकार बिहारी रायजादा यांना कॅलिग्राफी कला अवगत असल्याने लिहिण्याचे काम त्यांना देण्यात आले.
प्रास्ताविका व ईतर पानावरील सजावट आणि नक्षीकाम जबलपूरचे व्यौहार राममनोहर यांनी सुबक केली आहे.
मुळ घटनेत १ प्रास्ताविक ८ अनुसूची २५ भाग अन् ३९५ कलमे होती.पण जुलै २०१७ नंतर १ प्रास्ताविका १२ अनुसूची २५ भाग ४४८ कलमे ५ परिशिष्ट्ये आहेत आज पर्यंत १०१ घटना दुरुस्ती झाल्या आहेत.व्यापारातील सावकारी क्षेत्रात देखील आमचे काम टाक व दौत यांच्या मार्फत मुनींन आमचा वापर करुन उधारी व आर्थिक लिखापडी माझा उपयोग करुन खात्याच्या वहीवर मला शब्द लिहितांना मनस्वी आनंद होत होता.आता संगणक युग आल्याने माझ्यावरचा भार कमी झाला.आपला देश भारतीय धर्मग्रंथ संविधान ग्रंथराजाच्या कायद्यावर चालतो.देशातल्या न्याय मंदिरात न्याय देवते पुढे न्याय दान करतांना वादी अन् प्रतिवादी यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर साक्ष पुराव्याच्या आधारावर निर्णय घेवून प्रकरण निकाली काढतांना माझा वापर करुन न्यायदान करतो. माझे टोक तोडून निकाल देतांना सन्मानिय न्यायाधिश साहेब माझा वापर करतो.
सर्व बँकेत व्यवहार करतांना पैसे भरणा करताना व पैसे उचलतांना व्यवहार किती ही मोठ्या रक्कमेचा असो अगदी रुपये दोन रुपये माझी किमंत असली तरी अरबो-खरबोचा व्यवहार माझ्या मुळेच होतो.व्यवहार करतांना लागणारी स्वाक्षरी माझ्या मुळेच करता येवून ग्राहकांची ओळख पटवून देतांना मला हर्षानंद होतो.जगभरातील सर्वच कार्यालयात माझ्या शिवाय पानच हालत नाही.सर्व ऑफीसचे कामकाज माझा उपयोग करुन सर्व व्यवहार अपटूडेट ठेवल्याने मला समाधान मिळते.
विद्यार्थ्यांना पहिल्या वर्गा पासुन ते आयुष्यभर मी उपयोगात येते.परीक्षेत विद्यार्थी माझा उपयोग करुन उत्तीर्ण होतात.होमवर्क असो का क्लास वर्क मला वापरुन असंख्य माझ्या सारख्याना रिक्त करुन आपले विद्यार्थी जीवनाला आकार देत आसतात.विश्वातील लेखनी बहाद्दर साहित्यिक, कवी माझा वापर करुन लिहिणाऱ्यांनी माझा उपयोग करुन अजोड अन् मौलिक लेखन करुन मला अजरामर केल्याने मला धन्यता वाटत आहे.सध्याला सर्व ठिकाणी माझा वापर होतांना आनंद होत आहे.सर्व नियतकालिकांच्या लेखनी बहाद्दर संपादक आणि पत्रकार ,बातमीदार,स्तंभलेखनकार या सर्वाची मी अत्यंत लाडाची आहे.पण मला विश्वासार्हता संपादन करण्यास आनंद वाटतो,जेंव्हा करारपत्र, स्टॅम्प पेपरवर विधीज्ञांच्या समर्थ हस्ते माझा वापर केला जाते त्यावेळी मन भरुन येते.तो कागदही बाँड पेपरचा मग काय मला चालण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळतो.वाऽऽऽ..ऽऽ..ऽऽ काय आनंद अवर्णनीयच!पण सध्याच्या संगणकीय युगात, कम्प्युटर, मोबाईल मोबाईलवर आलेले विविध ऑडिओ टाईपरायटर आल्याने आणि एम.सी.क्यू.स्पर्धात्मक परीक्षेत फक्त गोल-गोल करुन उत्तर देण्याच्या पध्दतीत तर माझे महत्व कमी होतांना मनास यातना होतात पण…बदल होणे हे स्वाभाविक आहे.माझे शल्य तुमच्या पुढे मांडतांना शल्य असले तरी माझा इतिहास सर्वापुढे मांडता आल्याने माझे मन मोकळे करता आले.माझे शल्य मांडतांना जर चुकले असेल तर उदार अंतःकरणाने माफी असावी.यासाठी धन्यवाद सुंदर अक्षर कार्यशाळा शिवाजीनगर कंधार यांना जाते.सुलेखनकार गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी, रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा,ता.कंधार यांनी मला सांगण्यासाठी प्रवृत्त केले. त्या बद्दल त्यांचे आभार मानून मानाची कोटी-कोटी जयक्रांति करुन थांबते.जयहिंद…!जय महाराष्ट्र…..जयक्रांति…!शल्य लेखन
गोपाळसुत-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपूरा,ता.कंधार ९८६०८०९९३१

