
कंधार :(दिगांबर वाघमारे )
कलंबर येथील भूमिपुत्र डॉ. संदीप गोरे यांच्या पुढाकारातून कलंबर गावकऱ्यांनी एक लक्ष वृक्षलागवडीचा ” मंगलवन ” निर्माण करण्याचा संकल्प रविवारी दि.१६ ऑगस्ट रोजी केला.
वड, पिंपळ, बेल, या रोपांचे यावेळी रोपन करण्यात आले.हिरव्या गर्द मनमोहक ३० हेक्टर परिसरात निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून मंगलवन साकारण्यात येणार आहे.
” प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या नावाने दोन झाडे लावून ती जोपासली पाहिजे. महाराष्ट्राला अभिमानास्पद वाटेल असे मंगलवन साकारण्यात येईल असे आश्वासन डॉ. संदीप गोरे यांनी दिले.
पानभोसी येथे वनसंपदा निर्माण करुन वनप्रेमींचे आयडॉल असलेल्या श्री. घोडके यांनी शास्त्रोक्त पद्धतीने रोपांची लागवड, संगोपन, व काळजी कशी घ्यावी यासंबंधी माहिती दिली.कार्यक्रमास सरपंच उमाकांत सोरगे, समर्थ इंडस्ट्रीज नांदेड चे संतोष अमिलकंठवार,वनपाल ज्ञानेश्वर हाकदळे,मुसळे,हरी भाऊ गोरे.प्रविण कच्छवा,प्रा.बालनराव गोरे,श्रीधर गोरे,बाळुआप्पा बोंदकुळे,प्रा.डी.एस.जाधव,संगमेश्वर पाटील कदम,विलास कल्हाळे,अतुल शेठ,पांडुरंग सोमासे,बालाजी बोईनवाड,सुदाम गोरे. पिंटू मरमट,परमेश्वर कदम,कटकेमोड राजू आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमांचे सुत्रसंचलन विशाल कल्हाळे यांनी केले.
video news





