तथागत गौतम बुद्धानी जगाला दिलेल्या शांतीच्या संदेशाचे आजच्या तरुणांनी पालन करावे – बालाजी चुकलवाड ; कंधार येथिल विहारात माजी सैनिकांनी केले अभिवादन

कंधार ; प्रतिनिधी

तथागत गौतम बुद्धानी जगाला शांतीचा संदेश आपल्या शिकवणीनुन दिला आहे. आज सर्वत्र जो तो आप आपला लाभ मिळवलात व्यस्त असून परिणामी भांडण वाढले आहेत, आजचा तरुणांनी गौतम बुद्धाच्या शिकवणीचा अवलंब करावे असे प्रतिपादन माजी सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी कंधार येथे आज बुधवार दि 26 मे रोजी केले .

माजी सैनिक संघटनेच्या वतीने कंधार येथिल बुध्द विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्याने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी बालाजी चुकलवाड बोलत होते.

यावेळी माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष अर्जुन दादा कांबळे, तालुका सचिव पोचीराम वाघमारे, कार्याध्यक्ष गोविंद सूर्यवंशी, मुख्याध्यापक राजहंश शहापुरे ,पत्रकार एस. पी .केंद्रे , माजी सैनिक शेख जिलानी, माजी सैनिक एम.जी. शेख ,सेवारत सैनिक शिवहार कागणे..आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *