कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील रमाई आवास योजने अंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरकुल मंजुर झाले आहेत.यातील अनेक लाभार्थ्यांनी आपल्या घराचे काम पुर्ण केले आहे तर काहीचे लाॕकडाऊनमुळे अर्धवट राहीले आहे.या योजनेतील लाभार्थी चे थकलेले बिल तात्काळ आदा करण्यात यावी अशी मागणी कंधार तालुक्यातील माजी सैनिकांनी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे केले आहे.
सध्या महाराष्ट्रात कोरोना व्हायरस या महामारीचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी लाॕकडाऊन असल्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडला आहे.या संकटाचा विचार करुन घरकुलांची बाकी असलेली बिले त्वरीत लाभार्थ्यांना देण्यात यावे व बिल काढण्यासाठी काही अधिकारी लाभार्थ्यांनी
पैसे मागत आहे ही होणारी लुट थांबावावी अशी मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकुलवाड यांनी निवेदनाद्वारे गटविकास आधिकारी यांच्याकडे केली आहे.यावेळी माजी सैनिक पोचिराम वाघमारे ,माजी सैनिक शेख यांची उपस्थिती होती,

