कंधार लोहा तालुक्यातील मन्याड नदीच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे -आमदार श्यामसुंदर शिंदे

कंधार ; प्रतिनिधी

कंधार लोहा तालुक्यातील मन्याड नदीच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी जनतेला केले आहे.

नांदेड जिल्हातील सर्वत्र ठिकाणी अतिवृष्टी होत आहे.काही ठिकाणच्या गावातील नागरिकांचे संपर्क हि तुटले आहेत काही गावातील लाईट नाही अश्या परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी व घरीच राहावे तसेच एक दोन दिवस हि परिस्थितीती राहाण्याची शक्यता हवामान खात्यानी दिलेली आहे.

संपूर्ण नागरिकांनी सतर्क राहावे मी वेळोवेळी प्रशासनाच्या संपर्कात आहे आणि आजच मतदारसंघाच्या कामानिमित्त मुंबईला गेलो असता मला कळाल्यास मी तातडीने मुंबई ऊन आज नांदेड ला आलेलो आहे आपण घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहान
कंधार लोहा मतदार सघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *