गोरक्षकांवर हल्ला करणार्यांवर गुन्हे दाखल करा-भाजपा ची मागणी

कंधार ; प्रतिनिधी

  बिलोली शहरामध्ये पवित्र पोळा ह्या सणाच्या दिवशी गो रक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी मागण्यासाठी निवेदन तहसीलदार कंधार यांना भाजपा च्या वतीने देण्यात आले.

बिलोली जिल्हा नांदेड येथे पवित्र पोळा सणाच्या दिवशी बजरंग दल कार्यकर्ते व गोरक्षक यांनी गाईंना कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्याना हटकले असता त्यांच्यावर धर्मांधांनी हल्ला केला त्यात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत हल्ला करणार्यावर गुन्हा दाखल न करता गोरक्षक व बजरंग दला च्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले ,ही दाखल करण्यात आलेले गुन्हे वापस घेऊन,गोहत्या करणार्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी तहसीलदार कंधार यांच्या कडे दि ९ सप्टेंबर रोजी दिले आहे.

या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहर सरचिटणीस मधुकर डांगे,भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाउपाध्यक्ष माधव जकापूरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *