गऊळ येथिल साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा हटवणा-या व लाठीचार्ज करुन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या जातीयवादी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्र्याना निवेदन

कंधार ; प्रतिनिधी

गऊळ ता.कंधार येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा समाजाला विचारात न घेता हटवल्याबद्दल.व मातंग समाज बांधवांवर लाठीचार्ज करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. समाज बांधवावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले ते गुन्हे मागे घ्यावी व या प्रकरणातील समाजकंटक व जातीयवादी अधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी पालक मंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण यांचा कंधार दौऱ्यावर आले असता त्यांना समाज बांधवांच्या वतीने व संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे,रेड पॅंथरचे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ मळगे,व्यंकट कांबळे, कैलास कांबळे, साईनाथ गायकवाड, ऋषिकेश राजकैर, विकी गायकवाड, पराक्रम कांबळे, भूपेंद्र कांबळे.आदीसह समाज बांधवाची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *