सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती असणे आवश्यक- जिल्हा न्यायाधीश सलगर ; शेकापूर येथे कायदेविषयक शिबीर

कंधार दि.कायदा सर्वांसाठी असतो. विशेष करून महिला, मुले, जेष्ठांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. या कायद्यामुळे त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होते. त्यांना न्याय मिळतो. कायद्याची माहिती नसल्यामुळे पक्षकारांना त्रास सहन करावा लागतो. हा त्रास दूर सारण्यासाठी सर्वसामान्य माणसाला कायद्याची माहिती असणे आवश्यक असल्याचे कंधारचे जिल्हा न्यायाधीश अतुल सलगर यांनी सांगितले.


तालुक्यातील शेकापूर येथे दि. ४ रोजी तालुका विधिसेवा समिती व अभिवक्ता संघाच्यावतीने कायदेविषयक शिबीर पार पडले. यावेळी मारोती मंदिरात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अड. दिगंबर गायकवाड, सचिव अनिल डांगे, विस्तार अधिकारी टी. टी. गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हा न्यायाधीश सलगर म्हणाले की, सद्या अनेकजण आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत. यामुळे वयस्कांना जीवन कंठीत करणे अवघड होतं आहे. मुलगा असो की मुलगी त्यांना आईवडिलांचा सांभाळ करणे आवश्यक आहे. ही जाचक प्रथा दूर करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहेत. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आईवडिलांना सांभाळले नाही तर त्यांच्या विरोधात न्यायालयात पोटगी मागण्याचा अधिकार आहे. न्यायालय सर्व खातरजमा करून जेष्ठांना पोटगी मंजूर करते. असे अनेक कायदे आहेत. या कायद्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी या कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.


अड. अनिल डांगे यांनी प्रस्तविकात विविध कायद्यांची माहिती सांगताना लोकांमध्ये कायद्या विषयी असलेल्या अज्ञानामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले. यावेळी गावाच्या सरपंच मीराबाई भुस्कटे, प्राचार्य किशन डफडे, अड. रवी केंद्रे, अड. हफीज घडीवाला, अड. सागर डोंगरजकर, अड. बाबू पाटील, अड. दत्ता निलावाड, उपसरपंच मोरेश्वर मोरे, केशव कदम, माधव वाघमारे, सुधाकर वाघमारे,गणपत केंद्रे, भाऊराव केंद्रे, चव्हाण, मगरे, नरसिंग वाघमारे, गुणाजी निलावाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. अड. अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर ग्रामसेवक औराळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *