लोहा तालुक्यातील कापसी बुद्रुक येथिल शेतकऱ्याची आत्महत्या

लोहा ; प्रतिनिधी

सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कंटाळून एका 33 वर्षीय युवा शेतकऱ्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्या ची घटना लोहा तालुक्यातील कापसी बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी उस्माननगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.

मागच्या दोन चार वर्षापासून जिल्ह्यात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टी होऊन शेतातील पिकांची पूर्ण नासाडी होऊन नापिकी झाली. या नापिकीला कंटाळून श्रीपाद बालाजी वळवले वय वर्ष तेहतीस राहणार कापशी यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

सतत नापिकी होऊन उत्पन्नात घट झाल्याने श्रीपाद हे मागील काही दिवसांपासून नाराज, अत्यवस्थ होते. अखेर त्यांनी झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी राजू वडवले यांच्या फिर्यादीवरून उस्माननगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *