दलितांना पहिला न्याय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला -माजी मंत्री विनायकराव पाटील यांचे प्रतिपादन


अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

भारतीय पददलितांना पहिला न्याय महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवून दिला.असे प्रतिपादन माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ गंगासागर दाभाडे ताई उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, डॉ सिध्दार्थकुमार सुर्यवंशी, अहमदपूर पोलीस ठाण्याचे पी आय नानासाहेब नकाळ आणि बाबासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


पुढे बोलताना माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की एकच राजा होऊन गेला आहे. तो म्हणजे राजा शिवछत्रपती .आणि एकच साहेब होऊन गेले. ते म्हणजे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे होत.आज जो कुणी साहेब म्हणून घेत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले. यावेळी बालाजी वाघमारे सर आणि इतर भिम अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *