गऊळ
शंकर तेलंग
कंधार तालुक्यातील गऊळ येथील शेतकरी चिंतेत आहेत. दि. 15 डिसेंबर बुधवारी अचानक लाईट गेली. काही शेतकऱ्यांनी डिपीला येऊन पाहिलं. तर त्या ठिकाणी लाईट खात्यातल्या अधिकाऱ्याने लाईट कट केलेली दिसताच शेतकरी नाराज झाले.
शेतकऱ्याला बिल भरण्याचा वाव न देता वेळ न देता काही न सांगता लाईट कट केली. लाईट कट करण्यात आली आहे असे निदर्शनात आले. गऊळ गावातली ओलिताखाली घेणाऱ्या क्षेत्र जास्त आहे. शेतकरी
आता कसेबसे संकटातून ओल्या दुष्काळातून, अतिवृष्टी, पूर पडी, तून बाहेर निघाले होते. तर त्यांच्यासमोर बिलाचं संकट आलेला आहे.
आता पेरलेलं वावरात पिक त्याचे कोंब बाहेर पडले आहे. पाण्याची अत्यंत गरज आहे. गहू हरभरा, ज्वारी, पीक वरळण्याच्या मार्गावर लागले आहे. त्यामुळे शेती पंपाच्या बिलाबद्दल शेतकरी नाराज आहे.