धोंडीबा बोरगावे यांच्या मागणीला तर ग्रा.पं. च्या पाठपुराव्याला आले यश..आता फुलवळ येथे भरणार आठवडी बाजार!

फुलवळ

 कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आठवडी बाजार भरवावा अशी येथील पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी ता. २० जानेवारी २०२२  रोजी ग्राम पंचायत कडे लेखी निवेदन देऊन रीतसर मागणी केली होती. त्या मागणीवरून येथील ग्राम पंचायत ने ग्रामसभा घेऊन त्यात हा विषय ठेवून सर्वानुमते ठराव संमत करून घेतला होता. त्यानंतर सदर ठरावाची प्रत जोडून ग्राम पंचायत ने तहसीलदार कार्यालय , कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन फुलवळ येथे आठवडी बाजार भरवण्यास परवानगी मागितली होती , त्या मागणीला कृषी उत्पन्न बाजार समिती व तहसील कार्यालय ची परवानगी मिळाल्याचे सरपंच विमलबाई मंगनाळे यांचे  प्रतिनिधी नागनाथराव मंगनाळे यांनी माहिती दिली असल्याने आता फुलवळ येथे आठवडी बाजार लवकरच भरणार असून पत्रकार धोंडीबा बोरगावे यांच्या मागणीला तर ग्राम पंचायत च्या पाठपुराव्याला नक्कीच यश मिळाले असल्याच्या प्रतिक्रिया जणमाणसांतून ऐकायला मिळत आहेत.



     ता. २० जानेवारी २०२२ रोजी फुलवळ ग्राम पंचायतकडे लेखी निवेदनात धोंडीबा बोरगावे यांनी केलेल्या मागणीत सविस्तर मांडलेले मत असे की ,






    कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि. प. गटाचे आणि जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले सदन गाव असून अकरा सदस्यीय ग्राम पंचायत असलेल्या याच फुलवळ वरून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य मार्ग जातो , एवढेच नाही तर फुलवळ च्या भोवताल बहुतांश लहान मोठे गाव , वाड्या , तांडे आहेत. येथे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आता आपापल्या व्यवसायावर चांगलाच जम बसवला असल्याने खरेदीसाठी व प्रवासासाठी येथे दररोज मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ असते . तेंव्हा फुलवळ येथे आठवडी बाजार चे जर आयोजन झाले तर नक्कीच जनतेला सोयीसुविधा मिळतील आणि व्यापाऱ्यांना तर लाभ होईलच पण त्याबरोबरच कराच्या माध्यमातून ग्रामपंचायत चा आर्थिक स्रोत वाढण्यास चांगली मदत होईल. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून फुलवळ येथे आठवडी बाजार चे आयोजन ग्रामपंचायत ने करावे असे लेखी निवेदन ग्रामपंचायत कडे देऊन धोंडीबा बोरगावे मागणी केली होती.

      ता. २० जानेवारी २०२२ रोजी ग्राम पंचायत ला दिलेल्या निवेदनात आठवडी बाजार च्या आयोजनाची मागणी करतांना असेही म्हटले होते की , फुलवळ सह परिसरातील शेतकरी हे सदन असून कष्टाळू व शेतीनिष्ट असल्याकारणाने या भागातील बहुतांश लोक हे भाजीपाला , फळबाग , कडधान्य ची लागवड व विक्री करतात. तो माल विक्री साठी कंधार या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना जावे लागते , त्यासाठी वेळेबरोबरच आर्थिक झळही सोसावी लागते. 



   एवढेच नाही तर आता सध्या फुलवळ येथे सर्वच प्रकार चे साहित्य , वस्तू , दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे साहित्य योग्य भावात आणि गावातच मिळत असल्याने येथील मार्केट ला पण भविष्यात याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसे पाहता कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त इतर खरेदीसाठी शक्यतो फुलवळ सह परिसरातील माणूस फुलवळ ओलांडून पुढे जायला तयार नाही. कारण त्यांना समाधानकारक माल योग्य दरात येथेच मिळत असल्याने त्यांचा वेळ व होणारी आर्थिक हानी सुद्धा आटोक्यात आली आहे. 

    यासर्व बाबींचा सकारात्मक विचार करून ग्राम पंचायत ने आपल्या सभागृहात सदर निवेदन ठेवून चर्चा करावी , आठवडी बाजार चा ठराव घेण्यासाठी ता. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्रामसभेत हा प्रस्ताव मांडून उपस्थित ग्रामस्थांच्या जनप्रतिक्रिया घेऊन प्रस्ताव मार्गी लावावा व फुलवळ येथे आठवडी बाजार चे आयोजन करावे अशी मागणी केली होती.

  त्यावरून फुलवळ ग्राम पंचायत ने ग्रामसभा घेतली , ठराव संमत करून घेतला आणि तहसील कार्यालय कंधार व कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार करून आठवडी बाजार भरवण्यासाठी परवानगी मागितली होती ती नुकतीच मिळाली असल्याने मागणीला व पाठपुराव्याला यश आल्याने फुलवळ सह परिसरातील नागरिक व छोट्या मोठ्या व्यावसायिक , व्यापाऱ्यात आनंदाचे वातावरण निर्माण असून आता उत्सुकता आहे ती बाजार च्या शुभारंभाची व आठवडी बाजार चा वार व ठिकाण निश्चित करण्याची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *