कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील सर्व सामान्य मानसाचे शासन स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित अजून ते तात्काळ सोडवण्यासाठी माजी सैनिक संघटनेच्या वतीने ३० मे रोजी कंधार तहसिल कार्यालया समोर आयोजित जनता दरबारचा कंधार तालुक्यातील जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहन आज रविवार दि.२९ मे रोजी माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी केले आहे.
तालुक्यामधे सैनिक असतील किंवा जणता असेल त्यांची कामे शासन दरबारी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.काम जरी साधे असले तरी पैशामुळे ते काम पेंन्डींग ठेवले जाते.आणि त्या कामासाठी जणतेला चकरा माराव्या लागतात म्हणून कंधार तहसील कार्यालयाच्या समोर माजी सैनिक संघटनेच्या वतीने ३० मे रोजी जनता दरबार आयोजित केला आहे
तालुक्यातील कुठल्याही कार्यालयाच्या संमधींत काम आसु द्या त्या कार्यालयात दाखल केलेल्या कामाची पोच पावती तथा रिसिव्ह घेतलेली कागद सोबत घेऊन यावे.कुठलेही काम आसु द्या कागदपत्रे सोबत घेऊन या नक्कीच माजी सैनिक संघटना न्याय मिळवून देणाचा प्रयत्न करणार आहे.

कंधार शहरासह तालुक्यातील जननेनी या जनता दरबाराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

