बामणी येथील सदाशिव कदम या शेतकऱ्यांचा साप चावल्यामुळे मृत्यू ; गावावर शोककळा

कंधार : तालुक्यातील बामणी ( पं.क.) येथील शेतकरी सदाशिव रघुनाथ कदम हा शेतकरी शेतामध्ये गवत कापणीचे काम करत असताना दिनांक ०९.११.२०२२ रोजी दुपारी एक वाजता सदाशिव कदम हा शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात गवत कापणीचे काम करत असताना अचानक त्यांना विषारी सापाने चावा घेतल्यामुळे त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर दिनांक १२.११.२०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली रविवारी त्यांच्यावर बामणी येथे समशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात आले सदाशिव कदम या शेतकऱ्यांना साप चावल्यानंतर त्यांनी चार दिवस झुंज दिली अखेर विषारी साप चावल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे बामणी गावांवर शोककाळा पसरली आहे सदाशिव कदम या शेतकऱ्यांचे वय ६५ वर्ष असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले नातवंड असा मूर्त पावलेल्या शेतकऱ्यांचा परिवार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *