महात्मा कबीर समता परिषदेचा महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार युवा सामाजिक कार्यकर्ते पिंटू कदम यांना प्रदान

 

कंधार ; प्रतिनिधी

महात्मा कबीर समता परिषद यांच्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार २०२२ कंधार येथील युवा सामाजिक कार्यकर्ते पिंटूभाऊ भगवानराव कदम यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आज दिनांक २५ डिसेंबर रोजी नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

शंकराव चव्हाण सभागृह नांदेड येथे आज २५ डिसेंबर रोजी सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले . यावेळी सौ.जयश्री जयस्वाल संचालिका महा संतोषी मुलीचे वस्तीगृह नांदेड , बहुजन समाज पार्टी नांदेड चे मनीष दादा कावळे , महात्मा कबीर समता परिषद चे पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉक्टर अडवोकेट मुकुंदराव पाटील ,लवकुश जाधव आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती .

या पुरस्कारा बद्दल पिंटू कदम यांचा सर्वच क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *