बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली

बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तात्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही देवून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेत-शिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन्, निताणेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *