गोरक्षकांची हत्या करणाऱ्यावर कारवाई करा हिंदुत्ववादी संघटनेची मागणी

 

कंधार ; प्रतिनिधी

शिवनी ता किनवट येथील गोरक्षकांवर हल्ला करून त्यांची हत्या करणाऱ्या व इतर पाच गोरक्षकांना मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्यावर कारवाई करावी तसेच सदरील घटनेचा निषेध करत सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने निषधाचे निवेदन तहसीलदार कंधार यांना दि .२१ जुन रोजी दिले आहे .

सकल हिंदू समाज कंधारच्या वतीने दिनांक २१ जून रोजी तहसीलदार कंधार यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की इस्लापूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवनी येथे १९ जून रोजी कत्तलीसाठी जाणारे गोवंश गोरक्षक यांनी रोखले त्यामुळे गोवंशाची तस्करी करणारे यांनी शेखर रामलू या गोरक्षकावर सशस्त्र हल्ला करून त्याची हत्या केली व त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे इतर पाच गोरक्षकांना गंभीर जखमी केले त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाल्याचे निवेदनात म्हटले आहे, गोवंश हत्या बंदी असतानाही नांदेड जिल्ह्यात सर्रास गोहत्या व गो वंशाची कत्तलीच्या उद्देशाने तस्करी केली जात आहे या विषयात प्रशासनाने गंभीर लक्ष घालावे व गोवंशयाची होणारी तस्करी व हत्या तात्काळ थांबवावी, गोरक्षक शेखर रामलू यांची हत्या करणाऱ्या वर कडक कार्यवाई करावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्या वर वचक राहील असे, कृत्य थांबले नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर अड गंगाप्रसाद यन्नावार,भगवान राठोड ,अजय मोरे ,विशाल बासटवार ,शिवाजी श्रीमंगले ,सागर डोंगरजकर ,राम वाघमारे, प्रशांत बनसोडे ,विशाल . गवळे ,शेखर वडजकर ,केदार मुत्तेपावर,सुमित गोरे ,बालाजी निकम ,संकेत आंबेकर,, प्रवीण बनसोडे ,रवी संगेवार ,राजू कागणे ,रामदास बाबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *