चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार प्रकरणे प्रलंबित ;समिती गठीत करण्याची योगेश पाटील नंदनवनकर यांची मागणी

 

कंधार ; प्रतिनिधी

चार वर्षापासून संजय गांधी निराधार समिती गठीत न झाल्यामुळे शेकडो निराधार,विधवा,अपंग,वयोवृद्ध गोरगरीब लाभार्थ्यांचे अनेक प्रकरणे प्रलंबित असल्यामुळे तात्काळ बैठक घेऊन प्रकरणे निकाली काढण्याच्या मागणीचे निवेदन आज मा. कंधार तहसीलदार राम बोरगावकर यांना शिवसेनेचे योगेश पाटील नंदनवनकर यांनी दिले .

यावेळी तहसिलदार बोरगावकर यांनी तात्काळ सदरील प्रकरणी लवकरात लवकर बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *