हणमंत कल्याणपाड वयोमानानुसार सेवानिवृत्त..

 

कंधार : प्रतिनिधी

कंधार तालुका कृषी कार्यालयातील लिपिक हणमंत मारोतीराव कल्याणपाड हे नियत वयोमानानुसार ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी हणमंत कल्याणपाड म्हणाले की आपण सेवा काळात कमावलेली माणसे हीच आपल्या सेवानिवृत्तीनंतर कामी पडतात. ज्या सहकार्यासोबत दीर्घकाळ काम केले त्यांना सोडून जाताना मनाचा हळवा कोपरा नक्कीच भाऊक होतो. कुठल्याही सेवेत काम करीत असताना प्रत्येकाला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती लागते. परंतु सेवानिवृत्ती म्हणजे थांबणे नसून आयुष्याचे एक वळण आहे. या वळणावर जरा विसावून पुन्हा नवीन इनिंग सुरू करता येते. असे ते म्हणाले यावेळी अधिकारी पदाधिकारी मित्रमंडळी नातेवाईक यांनी सत्कार केला शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *