छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्फ कायदा’ रद्द करा ! नांदेड आणि परभणी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर !

 

 

 

नांदेड, १९ जुलै – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली ३५०० कोटी रुपयाची भूमी हडपून लँड जिहाद करणारा वफ्क बोर्ड कायदा रहित करण्यात यावा, या मागणीसाठी १७ जुलै या दिवशी परभणी येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे आणि नांदेड येथील अप्पर जिल्हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लॅण्ड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्फ’चा काळा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

या वेळी श्री महेश काळे, श्री मंदार कुलकर्णी, श्रीनिवास लाहोटी, श्री. अमोल देशमुख, श्रीनिवास दिवाण, श्री. उदय बद्गुजर आदी उपस्थित होते.

______

 

परभणी येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांना निवेदन देताना विविध हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *