कंधार आयटीआयच्यावतीने २ ऑक्टोबरला भुईकोट किल्ला येथे साफसफाई ; प्राचार्य पाटनुरकर यांची माहिती

कंधार ; प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या – राज्यभिषेक सोहळ्यास ३५० वर्षे पुर्ण झाल्याबद्दल कौश्यल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्यावतीने राज्यातील सर्व गडकिल्ले दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्यात येणार आहे.

 

त्यानुषंगाने कंधार येथिल भुईकोट किल्ला येथे कंधार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य  पाटनुरकर

जी.जी.यांनी दिली.

 

कौश्यल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी राज्यातील सर्व गडकिल्ले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
यांच्याकडून दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे.

 

त्यानुसार कंधार येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने दि. २ ऑक्टोबर रोजी भुईकोट किल्ल्याची स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून या स्वच्छता अभियनात संस्थेतील ३० प्रशिक्षणार्थी व १० कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहितीही प्राचार्य  पाटनुरकर जी.जी.यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *