ही हो म्हणाली . … आणि ती पण…

 

माझे वाचक ज्यांना मी एकदा एका गृपच्या गेटटुगेदरला भेटले होते त्यामुळे मी त्यांना वैयक्तिक ओळखते आणि ज्या त्यांच्या मैत्रीणी आहेत त्यांनाही ओळखते..
आज सकाळी त्यांनी मेसेज करुन फोन केला आणि माझ्याकडे मदत मागितली.. त्यांचा किस्सा ऐकुन मी या प्रकरणात काहीही मदत करु शकत नाही असं सांगितलं कारण ५५ वयाच्या व्यक्तीला जिला स्वतचा संसार आहे.. मोठी मुलं आहेत आणि उत्तम बिझनेस आहे त्याला या अशा भानगडी का कराव्या लागतात हेच कळत नाही आणि विशेष म्हणजे फक्त शारीरिक सुखासाठी किवा बदल म्हणुन किवा फुकट मिळतय म्हणुन .. त्यांच्या तोंडुन त्यांची स्टोरी ऐकुन किळस आली , वाईट वाटलं , थोडा राग आला , दुख झालं पण २ मीनीटात मी त्यातुन बाहेर पडुन माझ्या कामाला लागले
नंतर वाटलं अशी अनेक मंडळी गृपद्वारे ,सोशल मिडीयाद्वारे संपर्कात येतात आणि वाताहात करुन घेतात त्यामुळे यावर लिहावं…
ही व्यक्ती एका गृपमधे एका मॅरीड स्त्रीच्या संपर्कात आली .. त्यांनी गुळ लावला की तिने ते माहीत नाही पण जवळपास ४५ वयाच्या स्त्रीच्या हे साहेब प्रेमात पडले.. प्रेम कसलं सगळं सेक्ससाठी जर प्रेम असतं तर त्याच गृपमधल्या अजुन एका स्त्रीच्या प्रेमात ते पडलेच नसते.. विकृती म्हणायची का ??.. त्यांच्या म्हणण्यानुसार त्या स्त्रीने शारीरिक सुखाची त्यांच्याकडे मागणी केली म्हणुन ते एकत्र आले.. तीन चार वेळेस तिला भेटुन झाल्यावर यांना पुन्हा एकदा नावीन्याची ओढ लागली.. त्याच गृपमधली अजुन एक स्त्री त्यांच्या संपर्कात आली आणि सेम तेच सुरु झालं.. त्यांच्या म्हणण्यानुसार तिचीच गरज होती.. दोन्ही वेळा स्त्रीचीच गरज होती मग यांना गरज नव्हती का ??.. सगळ्या स्त्रीयांच्या गरजा पुरवायला यांना बरा वेळ मिळतो.. उद्या दोघींपैकी एकीला जरी आर्थिक मदत लागली किवा काही द्यावं लागलं तर हे नक्कीच आखडता हात घेतील कारण मी त्यांना वैयक्तिक ओळखते..
त्यापुढे जाऊन या स्त्रीयांनी काय केलं ते गमतीदार आहे त्यातील एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला ही गोष्ट सांगितली आणि दोघीत भांडण सुरु झालं.. या दोघींच्या भांडणात मी काय करु ?? याचं उत्तर हवय सोनल मॅम म्हणुन त्यांनी मला सकाळी फोन केला होता.. एकतर असले फालतु प्रश्न सोडवायला नक्कीच मी रिकामटेकडी नाही आणि अशा लोकांना मी काउंसीलींग पण करत नाही .. कारण ही नकळत घडलेली घटना नाही तर त्यांना सगळं माहीत असुन त्यांनी मिळतय ते घ्या अशासाठी म्हणजेच फक्त शारीरिक सुखासाठी ही थुकरट नाती जोडली आणि त्या दोन्ही स्त्रीयांची तर किव येते.. इतकं वय हौवुन आपला संसार असुन या अशा वहावत कशा जातात ??..आपल्याला घरुन मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण स्वतःला घडवण्यासाठी करायचा असतो .. बाहेर अनेक डोमकावळे गल्लोगल्ली आहेत त्यातील उत्तम व्यक्ती आपल्याला ओळखता यायलाच हवी ना.. यात चुक तिघांचीही आहे…
या अशा मानसिक विकृती असलेल्या व्यक्ती मैत्री करण्याच्याही लायकीच्या नसतात.. सख्यांनो माणसे ओळखुन मैत्री करा.. आपले शरीर आणि मन इतकेही स्वस्त नाही की त्याच्याशी कोणीही खेळावे त्याला किमती बनवा .. चारचौघात राहुन आपल्याला आपलं अस्तित्व टिकवता यायलाच हवं.. प्रत्येकाने आपला आदर केला पाहिजे आणि आदरातुन प्रेम निर्माण व्हायला हवं आणि ते तितकच पवित्रही हवं.. आपली आणि आपल्या संसाराची काळजी घ्या ..

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *