सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व हरपले! मनोहर जोशी यांना अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली

 

मुंबई : प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुजाण व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे माजी मुख्यमंत्री व राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, नगरसेवक, महापौर, विधानपरिषद व विधानसभेचे आमदार, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष व मुख्यमंत्री असा त्यांचा ‘गल्ली ते दिल्ली’पर्यंतचा संघर्षमय व प्रदीर्घ राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या नव्या पीढीसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.

 

कला, साहित्य, संस्कृतीवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. अतिशय व्यस्त दैनंदिनी असलेल्या काळातही आपले हे प्रेम त्यांनी कधी कमी होऊ दिले नाही. अभ्यासू व कुशाग्र बुद्धीमत्ता, फर्डे वक्तृत्व तसेच मार्मिक स्वभावाचे धनी असलेल्या मनोहर जोशी सरांकडे उत्तम संघटन कौशल्य होते. त्यातून त्यांनी आपला एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता. त्यांचे निधन महाराष्ट्राची मोठी हानी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *