जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपला! गंगाराम ठक्करवाड यांना खा. अशोकराव चव्हाण यांची श्रद्धांजली

 

नांदेड, दि. ८ मार्च:

भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष व बिलोलीचे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांच्या निधनामुळे सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेला नेता हरपल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.

ठक्करवाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्यापासून आमदारकीपर्यंत त्यांची राजकीय कारकिर्द होती. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि विधानसभा अशा अनेक स्तरांवर त्यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांना जनतेचे प्रश्न व प्रशासन दोहोंचीही चांगली जाण होती. त्यांचे संपूर्ण आयुष्य शेतकरी व समाजातील वंचित घटकांसाठी समर्पित होते. आयुष्यभर त्यांनी अनेक मोठमोठी पदे भूषवली पण त्यांची साधी राहणी बदलली, ना त्यांच्या नम्रतेत फरक पडला. नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी त्यांचे मोठे योगदान होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *