शेतकऱ्यांचा रस्ता अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संविधानीक पद्धतीने कायम लढा सुरूच राहणार – नारायण गायकवाड

 

कंधार  ( विश्वांबर बसवंते )
कंधार तालुक्यातील मौजे पेठवडज येथील मध्यम प्रकल्पाच्या बाजूने शेतकऱ्यांना जाण्यासाठी वाहिवाटेचा रस्ता दि.१० मार्च २०२३ पर्यंत सदर रस्त्यावर झालेले अतिक्रमण मुक्त करून द्यावा यासाठी दि.१२ मार्च २०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता पासुन आमरण उपोषण करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्याकडे केली होती

 

त्यास अनुसरून अतिक्रमण ठिकाणची पाहणी केलेले स्थळ अहवालसह अतिक्रमण स्थळी दि.१५ मार्च ते १९ मार्च २०२४ रोजी भेट देणार असून तुर्तास उपोषण मागे घ्यावे, अशा आशयाचे तोंडी आश्वासन देत उपोषणार्थींना उपोषणास पासून परावृत्त केले आह

तरी सदरील रस्ता अतिक्रमण मुक्त होईपर्यंत संविधानीक पद्धतीने कायम लढा सुरूच ठेवणार अशा प्रतिक्रिया उपोषणार्थी नारायण गायकवाड यांच्यासह उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *