शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा घवघवीत यश

 

कंधार प्रतिनिधी
     दरवर्षी प्रमाणे लातूर बोर्डाकडून मार्च-एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेत शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल हा ९१.६९.% लागला आहे.या परीक्षेला एकुन ३०७ विध्यार्थी बसले होते त्यापैकी २७८ विध्यार्थी उतिर्ण झाले आहेत.  महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दरवर्शी प्रमाणे याही वर्षी यशाची परमपरा कायमच ठेवली आहे.

सर्व गुनवंत विध्यार्थांचे व सर्व शिक्षकांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी जिल्हा परीषद सदस्य मा. सांभाजीराव पाटील केंद्रे व संस्थेचे सचिव व शेकापूर नगरीचे माजी सरपंच तथा चेअरमन शिवाजीराव पाटील केंद्रे, प्राचार्य मोतिभाऊ केंद्रे, पर्यवेक्षक व्यंकट पुरमवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

         विद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतून १८७ विद्यार्थ्यां पैकी १७८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९५.६९ टक्के लागला असून या शाखेतून मुंडे आकाश व्यंकटी.  ७५.५० टक्के, कु. पुजा लक्ष्मण बनसोडे ७१.८३ टक्के, कु.लक्ष्मी रमेश तोरणे ६९.६७ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. अशी माहिती शाळेकडून देण्यात आली आहे. विद्यालयातील बारावी कला शाखेचा ७६ विद्यार्थ्यां पैकी ६० विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या शाखेचा ८३.३३ टक्के निकाल लागला असून या शाखेतून कु. जामदार ऋतुजा बळीराम ७९.१७ टक्के,कु. कांगणे  निकीता रोहेजी ७८.१७ टक्के, कु.केंद्रे ज्ञानेश्वरी राजीव  ८१.८३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. वाणिज्य शाखेतून ४४ पैकी ३८ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेच्या निकाल ८८.३७ टक्के लागला आहे. या शाखेतून कु.कदम स्नेहा प्रकाश  ६६.५० टक्के, कु.डिगोळे अयोध्या श्रीराम  ६५.१७ टक्के, पठाण प्रवेज दिलंदार ६४.८३ टक्के कंधारे सुरज शेषराव ६४.८३ टक्के यांनी गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती शाळेकडून देण्यात आली आहे.

या निकालाचे सर्वश्रेय विद्यार्थ्यांचे पालकांचे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आहे असे संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले व सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
     या वेळी  प्रा. देविदास जायभाये, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. गोविंद आडे, संस्कृतीक विभाग प्रमुख  प्रा. अरुण केदार, प्रा. गिरीश नागरगोजे, प्रा.विजय राठोड .मोहित केंद्रे सर, व्यंकट पुरमवार सर, अमित लोंड सर, सुर्यकांत श्रीमंगले सर,एस.पी केंद्रे, संभु वाघमारे , मुकेश केंद्रे ,राजु केंद्रे ,परमेश्वर निलेवाड यांच्यासह उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *