कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथे मध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून डब्बा वाटप

नांदेडच्या इतिहासात अभूतपूर्व ठरलेल्या आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथे मध्ये धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून बाहेरगावाहून मुक्कामासाठी थांबलेल्या शेकडो भाविकांना भाऊचा डबा तसेच पाचशे छत्र्या वाटप करण्यात आल्या.

या कथेसाठी दररोज लाखो भाविकांनी हजेरी लावली. शेवटच्या दिवशी तर पाच लाखापेक्षा जास्त भक्तांच्या उपस्थितीचा विक्रम झाला. दररोज रात्री दहा हजारापेक्षा जास्त शिवभक्त पेंडॉलमध्येच मुक्काम करत होते. त्या गर्दीत शिवभक्तांना डबे वाटण्यासाठी दिलीप ठाकूर, सुरेश लोट, सुरेश शर्मा, शिवा लोट, राजेशसिंह ठाकूर,शिवचरण लोट, प्रसाद जोशी, विलास वाडेकर यांनी अत्यंत परिश्रम घेतले.

या सात दिवसात दिलीप ठाकूर यांच्या आवाहनानुसार अनेकांनी वरण भात भाजी पोळी असलेले भोजनाचे डबे दिले.२४ ऑगस्ट रोजी अन्नदान करणाऱ्यांमध्ये शिवप्रसाद राठी,ॲड. दिलीप ठाकूर ,श्रीराम मेडेवार,किशोर नोमुलवार,ला. ज्ञानेश्वर महाजन,वसंत कल्याणकर,उदयकुमार देशमुख,रजनी पेकमवार,श्रीमती सुमन सिंधाती,विलास बिरादार सर,उल्हास जोशी यांचा समावेश होता.शिवप्रसाद राठी, गणेश मालवदकर वसमत, प्राचार्य दीपक बच्चेवार, संजय उत्तरवार, सौ. रूपाली पेकमवार, भगवानदास आसवा उमरी, प्रमोद रऊळवार, शंकरराव कामीनवार, भानुदास काब्दे, गंगाबाई टेकाळे देगलूर, डॉ. बालाजी जाधव, सुरेखा पांडे, मराठवाडा वैश्य शिक्षक संघटना, संतोष निल्लावार, सारस पंतुलवार, किशनलाल कुटलेवाले,पी.के.जांबकर,सुधीर भुजबळ, संतोष पवळे यांनी २५ ऑगस्ट ला अन्नदान केले.

श्रावण सोमवार २६ ऑगस्ट रोजी सकाळ आणि संध्याकाळ साबुदाणा वडे,राजगि-याचे लाडू, केळी हे उपवासाचे पदार्थ वाटप करण्यात आले. यामध्ये नवलकिशोर गुप्ता,सतीश सुगनचंदजी शर्मा, शिवप्रसाद राठी, विश्वास गोगटे, शकुंतला कराड, प्रियांश पाटील मुखेडकर, रामराव वलबे, लक्ष्मीकांत जोशी, आदित्य कवटगे, सिद्राम दाडगे, राहुल रापतवार, भीम कोडगीरे, यश जुन्नावार, गजानन टाक, राम देबडवार, प्रदीप कुलकर्णी, श्री इंटरप्राईजेस, डॉ. संजय तेलंग उदगीर, ममता लाटकर, संध्या देशमुख यांनी योगदान दिले.२७ ऑगस्टला चंद्रकांत गंजेवार,शिवप्रसाद राठी, , सुरेश कुलकर्णी, द्वारकादास अग्रवाल, वरद सगरोळे, संदीप
सोनटक्के, शोभा पवार, धोंडीराज देशमुख, श्री चिंतामणी ट्रेडिंग कंपनी नवा मोंढा, कविता शिवरामवार, बालाजी वर्मा, अरुण मामीडवार हदगाव, कु. पल्लवी मनाठकर हदगांव, व्यंकट रविकार, मुकुंद जाधव व सौ. उज्वला करडीले, संतोष गडूम लोहा, रितेश अग्रवाल वसमत, महेश राजकुमार, अवधूत लाभसेटवार, रेखा देशपांडे, चंचल नांगलिया, ओम केंद्रे, संगीता इंगोले व सविता शिंदे, सुदर्शन भोकरे यांनी अन्नदान केले.श्रीनिवासा दाल उद्योग एमआयडीसी,प्रतिमा चेरेकर,उदय गंदेवार,भगवानदास आसवा उमरी,ज्योत्स्ना महाजन,डॉ.शैलेंद्र कवटीकवार मुखेड,अर्जुन शिंदे, डॉ. ऐश्वर्या घाटे,अर्जुन गुंडाळे, लक्ष्मीकांत मोटरवार,लक्ष्मीकांत बच्चेवार,सावित्री शिंदे,प्राचार्य प्रभाकर उदगीरे, श्रीकांत गोगटे,मोहिनी विजय येवणकर, व्ही.व्ही.लोकरे,श्री चिंतामणी ट्रेडिंग कंपनी नवा मोंढा ,विलास दत्तात्रेय माणिकवार,आशा नागभूषण दुर्गम,उमा ओमप्रकाश गट्टाणी यांच्यातर्फे २८ ऑगस्टला भाऊचा डबा वाटप करण्यात आला.

शेवटच्या दिवशी कथा सकाळी आठ वाजता सुरू होणार असल्यामुळे पहाटे सहा वाजता शिवभक्तांना कचोरी वाटप करण्यात आली. त्यासाठी प्रतिभा राठी, ललिता रमेश मुप्पीडवार,अनिल अग्रवाल,बालाजी श्रीराम उत्तरवार,निखिल पाठक,संतोष कडगे अंबाजोगाई,शिवकुमार मुगदाळे, ज्ञानेश्वरराव तुपतेवार भोकर,एक शिवभक्त,दीपक बिडवई, कमलकिशोर काबरा,डॉ. नंदिनी चौधरी,द्वारकादास अग्रवाल,सुनंदा देशमुख,डॉ. चेतन सातपुते,उदयकुमार पदमवार,गणेश केंधळे जामगव्हाण,कृष्णा वरपडे,आयुष देशमुख,निर्विषा देशमुख,विलास मोमाईवार,शंकर कापकर ,स्वप्निल चव्हाण,शंकर कापकर,कै.भास्करराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ,सिध्दि स्वंय सहाय्यता महिला बचत गट भाग्यनगर,विनायक तुप्तेवार हिमायतनगर,प्रतीक पतंगे,सुधाकरराव जबडे देगलुर,रूपाली दलाल वसमत,संतोष वडजे वसरणी,अंकुश वैजवाडे,कै. सुंदराबाई गोपालसिंग चौहान यांच्या स्मरणार्थ,राजेश्वर रायेवार हदगाव ,रिंकेश व रितेश रायेवार सौ.आपुलकी रायेवार हदगाव ,संजय हुंडेकर ,शशिकांत पाम्पटवार,दत्ता रामतिर्थे,दीपक देशमाने,बालाजी वर्मा,रत्नाकर जोशी,लक्ष्मीकांता तानुरकर धर्माबाद,वसनेकर सर यांचे सहकार्य लाभले.

नांदेड शहरात मुसळधार पाऊस पडल्यामुळे दोन दिवस पेंडॉल मध्ये कथा बंद ठेवण्यात आली होती. भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पाचशे छत्र्या वाटप करण्यात आल्या. त्यामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे ५०, चंद्रकांत गंजेवार याच्या तर्फे ४८ तर हॉटेल मिडलँड गोकुळनगर नांदेड व स्नेहलता जायसवाल हैदराबाद यांच्यातर्फे प्रत्येकी ३२ छत्र्या मिळाल्या आहेत. प्रत्येकी १६ छत्र्या देणाऱ्या मध्ये प्रमिला महेश भालके, डॉ. गोविंद भाकरे,एक राम भक्त,अशोक विठ्ठलराव पडगीलवार, रुहिका रूपेश मुत्तेपवार,सुरेश शंकरराव पळशीकर,आनंद सिताराम साताळे, ला. शिवाजीराव पाटील,मोहित व रेणुका सोनी, निर्मला द्वारकादास अग्रवाल,अबीरा राहुल पवार,वंदना शेळके परभणी,श्रीमती प्रतिमा चेरेकर,किशनराव रामपल्ली हडको नांदेड, सुरेश लोट,सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, कैलास महाराज वैष्णव, सविता काबरा यांचा समावेश आहे. पाचव्या वर्षाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आणखी १९२४ छत्र्यांची आवश्यकता आहे. किमान १६ छत्र्यासाठी रू.२५०० देणगी देणाऱ्यांची नावे छत्र्यांवर रबर प्रिंटिंग द्वारे छापण्यात येणार आहेत. ज्यांनी जितक्या छत्र्या दिल्या तितक्या छत्र्यांचे वाटप त्याच देणगीदारांच्या हस्तेच करण्यात येणार आहे. देणगीदारांची माहिती सोशल मीडिया च्या मार्फत पन्नास हजार लोकापर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे.तरी दानशूर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *