कोतवालांच्या चतुर्थ श्रेणीबाबत सरकारचा दुटप्पीपणा…..! मागण्या मान्य न झाल्यास 26 तारखेपासून मुंबईत आझाद मैदानावर करणार आंदोलन.

 

कंधार ; प्रतिनिधी

राज्यातील कोतवालांनी चतुर्थ श्रेणीचा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर पासून राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच 25 तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्यात येणार असून गुरुवारपासून दि 26 पासून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन कोतवाल संघटनेचे राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे यांनी शासनाला दिले आहे. अशी माहिती नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय केंद्रे यांनी कंधार येथे दिली.

महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचा घटक आहे. स्थानिक पातळीवरील नित्य नियमाची कामे पार पाडण्यात कोतवाल महत्त्वपूर्ण भूमिका व जबाबदाऱ्या पार पडत असून कोतवालांना अद्याप पर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही. त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही. कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे.

कोतवाल महसूल विभागातील शेवटचा घटक आहे. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणे, महसूल गोळा करणे, गौणखनीज आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाणी, दुष्काळात नुकसान भरपाई, पंचनामाचे सर्वेक्षण करणे, स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्य करत असतात. तसेच संगणक ऑपरेटर, शिपाई, पहारेकरी अशी अनेक कामे कोतवाल करत असतात. अशा अनेक कामकाजात कोतवाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र, हा कोतवाल साठ वर्षापासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व मा. महसूल मंत्री साहेब यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निघाली काढावा. अन्यथा होणाऱ्या नुकसान राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन गेल्या साठ वर्षांपासूनच्या मागणीचा निर्णय व्हावा अशी मागणी सध्या जोरदार आहे.

हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व कोतवाल या आंदोलनात सहभागी होणार आहेत. अशी माहिती जिल्हा उपाध्यक्ष संजय केंद्रे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *