भगवान राठोड यांचे पंतप्रधान यांच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव;पोहरादेवीच्या मंदिरात पंतप्रधान सोबत घेतले दर्शन

 

कंधार : प्रतिनिधी

कंधार लोहा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष बंजारा समाजाचे नेते भगवान राठोड यांचे पंतप्रधान यांच्या कार्यक्रम पत्रिकेत नाव असल्याने पोहरादेवीच्या मंदिरात पंतप्रधान सोबत पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत रामराव महाराज समाधी अशा तीन ठिकाणी दर्शन घेण्याचा योग लागल्यामुळे भगवान राठोड यांच्यासह बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.

भगवान राठोड हे गेले अनेक वर्षापासून समाजकारण, राजकारणात सक्रिय आहेत संत सेवालाल बंजारा बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बंजारा तांड्यांना महसुली दर्जा देणे,ग्रामपंचायत स्वतंत्र निर्माण करणे, या विषयात ते समाजामध्ये काम करत आहेत त्यांच्या पाठीशी नेहमी पोहरादेवीच्या संत महंतांचा आशीर्वादे राहिलेला आहे 5 ऑक्टोंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंजारा विरासत नंगारा भवन या वास्तु संग्रहालयाचा थाटात उद्घाटन झालं या उद्घाटन कार्यक्रमाला देशभरातला बंजारा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नांदेड विमानतळावर उतरून हेलिकॉप्टरने पोहरादेवी येथे उपस्थित राहिले

पोहरादेवी येथे जगदंबा माता मंदिर, संत सेवालाल महाराज मंदिर, संत रामराव महाराज समाधी अशा तीन ठिकाणी पंतप्रधानांनी भेट देऊन देवी आणि संतांचे दर्शन घेतले यावेळी जगदंबा माता मंदिरामध्ये कंधार लोहा तालुक्यातील भगवान राठोड यांना पंतप्रधान कार्यालयातून तयार झालेल्या कार्यक्रम पत्रिकेत संधी मिळाल्याने भगवान राठोड देवीच्या मंदिरात दर्शनाच्या वेळी उपस्थित राहिले पंतप्रधान महोदयांचे स्वागत केले ही बातमी कंधार लोहा तालुक्यात सर्वत्र पसरली विषयी तांड्या तांड्यातून आनंद व्यक्त केला जात असून आपल्या तालुक्यातील भूमिपुत्राला सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांला पंतप्रधान महोदयांना भेटण्याची संधी मिळाल्याने कंधार लोहा तालुक्यात कौतुक करून याविषयी त्यांचे अभिनंदन होत आहे
सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना सर्वोच्च नेतृत्वाला भेटण्याची संधी मिळते हेच यावरून सिद्ध होत या वेळी बंजारा समाजातील मानाचा कडा जो नायकाच्या हातात असतो तो भेट देण्यात आला सदरील कडा बनवण्याची जबादारी देवीभक्त शेखर महाराजांनी श्री राठोड यांच्या कडे दिली होती ती जबाबदारी भगवान राठोड यांनी पार पाडली. बंजारा समाजातला सर्वोच्च पद असलेले नायक आणि नायकाच्या हातात मानाचा असणारा कडा देशाचे नायक पंतप्रधान यांना देताना देवीभक्त शेखर महाराज यांनी दिला यावेळी धर्मगुरु बाबूसिंग महाराज उपस्थितीत होते. कार्यक्रमाला राज्यभरातून लखोंच्या संख्येने बंजारा समाजानी हजेरी लावली, लोकांचा समुद्र अशी आलोट गर्दी सभेला होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *