मुखेड: (दादाराव आगलावे)
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडच्या वतीने मराठी राजभाषा दिन व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा स्मृतीदिनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. कुुसूूम चांडोळकर मॅडम उपस्थित होत्या तर सत्कारमूर्ती म्हणून श्रीमती श्री नवेकर मॅडम, प्रमुख अतिथी म्हणून जोशी इन्फोटेकचे संचालक प्रा. जय जोशी सर व अखिल भारतीय साहित्य परिषद नांदेड जिल्हा संघटन मंत्री प्रा. डॉ.चांदोबा कहाळेकर सर, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडच्या अध्यक्षा डॉ. सौ.मनीषा देशपांडे जोशी मॅडम यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रज व तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडचे सचिव बालाजी निवृत्तीराव तलवारे यांनी केले व प्रास्ताविक अखिल भारतीय साहित्य परिषदेचे नांदेड जिल्हा संघटन मंत्री प्रा. डॉ. चांदोबा कहाळेकर यांनी केले. या कार्यक्रमात अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडच्या अध्यक्षा सौ. मनीषा प्रकाशराव देशपांडे जोशी मॅडम, सचिव बालाजी निवृत्तीराव तलवारे , उपाध्यक्षा – सौ. चांडोळकर मॅडम, कार्याध्यक्ष – मोहन अंदूरे, प्रसिद्धी प्रमुख सुरेश जमदाडे, सदस्य सुरेंद्र गादेकर, सदस्या सौ. पूनम नामदेव वाघमारे (तलवारे), कार्याध्यक्षा सौ. सुनंदा शिवाजीराव श्रीरामे मॅडम, सदस्या श्रीमती श्री नवेकर मॅडम, सदस्य प्रा. अर्जुन गजमल, मार्गदर्शक प्रा. जय जोशी, मार्गदर्शक प्रा. डॉ. राम धारासुरकर, तसेच निमंत्रित सदस्य तथा नांदेड जिल्हा संघटन मंत्री प्रा. डॉ. चांदोबा कहाळेकर या सर्व अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडच्या तालुका कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सत्कारमूर्ती श्रीमती श्री नवेकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांची स्वलिखित कादंबरी “वादळाशी झुंझताना” या कादंबरीतील स्वत:वर आलेल्या कठीण प्रसंगाशी कसे झगडले हे सांगताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सोबतच कविवर्य कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर यांच्या विषयी बोलताना त्यांच्या कवितेचे वाचन केले, प्रा. जय जोशी, प्रा.डॉ. चांदोबा कहाळेकर, प्रा. डॉ. मनीषा देशपांडे-जोशी, स्वातंत्र्यवीर सावरकर व कुसुमाग्रज जन्मदिवस व मराठी राजभाषा दिन यांच्या विषयी त्यांचा जीवन गौरव पट सांगितला. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना सेवानिवृत्त प्रा सौ. चांडोळकर मॅडम यांनी बोलताना म्हणाल्या की, “मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा… पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळीने समारोप केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती शाखा मुखेडचे सचिव बालाजी निवृत्तीराव तलवारे यांनी केले.

