मुखेड: प्रतिनिधी
भारताला शत्रूपासून समुद्री मार्गे धोका असल्याचे ओळखून छत्रपती शिवरायांनी आरमार ओवा करण्याचे महत्तम कार्य त्या काळात केले. शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक संबोधले जाते असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक तथा अभ्यासू पत्रकार यशवंत बोडके यांनी केले.
विद्यानिकेतन कमळेवाडी येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून श्री यशवंत बोडके बोलत होते.
कार्यक्रमास प्रा. विष्णू कौरवार, प्रा. अरविंद मुळे, वसतीगृह अधीक्षक रमेश आडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना यशवंत बोडके पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि या स्वराज्यामध्ये ऐतिहासिक कार्य केले म्हणून आज आपण 395 वर्षानंतरही छत्रपती शिवरायांच्या विचार अनुसरतो. छत्रपती शिवरायांनी त्यांच्या कार्यकाळात मराठी भाषा शुद्धीकरण, अष्टप्रधान मंडळ नेमणूक लोकशाही राज्य निर्माण, धर्म सुधारणा, शेतकऱ्यांना सहाय्य, आयात निर्यात धोरण, महिलांचा सन्मान, गड किल्ल्यांची उभारणी, इतर धर्मांचा सन्मान आदी क्षेत्रात ऐतिहासिक कार्य केले आहे. यावेळी प्रा. विष्णू कोरवार आणि प्रा. अरविंद मुळे यांनीही छ. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवकालीन वेशभूषा परिधान करून अफजलखानाचा वध आणि भवानी मातेने शिवरायांना भवानी तलवार भेट दिल्याचा प्रसंग बालनाटिकेतून सादर केला.
कु.शिवकन्या विष्णू दराडे (जिजाऊ ), शुभम चव्हाण (छत्रपती शिवाजी राजे ) यांची भूमिका पार पाडली. नाटिकेत इयत्ता अकरावीच्या अपेक्षा करपे, राहू पवार, प्रणाली चव्हाण, अर्चना जाधव, रोहिणी गालट, उर्मिला गावित, दिव्या जाधव, प्रेमलता भोये, नितू चौधरी, योगेश्वरी श्रीरामे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला तर इयत्ता आठवीच्या राणी दळवे, साक्षी चव्हाण, सई हिवराळे, वेदिका चव्हाण, शुभम चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नाटिका सादर केली.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन कु.धनश्री शिवाजी बागल यांनी तर आभार प्रदर्शन कु. सई प्रभाकर हिवराळे हिने मानले.
तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ – जय शिवराय! या उद्घोषनेने शाळा परिसर दणाणून गेला होता. मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सौ. प्रफुल्लता भडके, सौ.सुनीता पांडुर्णीकर,श्रीमती उप्पे मॅडम, रवींद्र माळवदकर, सदाशिव राठोड, अशोक बोईनवाड, आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

