कंधार तालुक्यातील पाताळगंगा येथील रहिवाशी असलेले रामप्रसाद चुक्कलवाड हे एक उत्तम शेतकरी.. शेतीचे काम करत करतच त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि संपूर्ण आयुष्यच यांचं ग्रामपंचायत च्या राजकारणात गेलं.. दिनांक 2मे 1983 साली चुक्कलवाड कुटुंबात एका खोडसर गोंडस मुलाचा जन्म झाला.. आई-वडिलांनी त्याचं नाव बालाजी ठेवलं.. हा मुलगा शरीराने दृष्टपुष्ट असल्याने रामप्रसाद चुक्कलवाड यांची नेहमी इच्छा असायची की, माझा मुलगा बालाजी हा देश सेवा करण्यासाठी मिल्ट्री मध्ये जावा.. गावात कोणतीही सुविधा नसतानाही केवळ वडीलाचे स्वप्न साकार करण्यासाठी बालाजी चुकुलवाडी आणि मिलिटरी मध्ये जाण्यासाठी खूप कसरत केली.. दिनांक 24 जानेवारी 2003साली वयाच्या अठराव्या वर्षी त्यांच्या या मेहनतीला यश आलं आणि त्यांनी मिलिटरी मध्ये दाखल झाले. मिलिटरी मध्ये काम करत असतानाही त्यांनी एक योद्धा प्रमाणे काम केले. दिनांक 31 डिसेंबर 2019 देशाची सेवा करून 17 वर्षानंतर सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परतले.. सतरा वर्षे देशाची सेवा केल्यानंतर त्यांना घरात स्वस्त बसणे राहवत नसल्याने सामाजिक सेवा म्हणून एका योद्धा सारखे धाडसी पणे लोहा कंधार तालुक्यात काम करत आहेत..
बालाजी रामप्रसाद चुक्कलवाड हे देश सेवा करत असताना त्यांना नेहमी एखाद्या युद्धात काम करण्याची संधी मिळावी अशी त्यांची नेहमी इच्छा असायची. परंतु त्यांच्या सतरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांना युद्धात जाण्याची संधी मिळाली नाही ही खंत आजही त्यांच्या मनात शैल्य करून आहे.. 17 वर्षाच्या नंतर सेवानिवृत्त होऊन माय भूमी परतल्यानंतर त्यांना सामाजिक कार्याची ओढ लागली. कोरोणा सारख्या महामारीत त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेऊन त्यांनी तीन महिने पोलिसांना सहकार्य केले. याच कोरोणाच्या काळात त्यांनी आपल्या वर्दीचा धाक दाखवून दिला.. त्यांच्या या धाडसी कामामुळे कंधार तालुक्यामध्ये त्यांची अवघ्या चार दिवसातच ओळख झाली..
लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्याची पहिल्यांदाच त्यांनी मागणी करून माजी सैनिकांच्या आशा पल्लवीत केल्या. माजी सैनिकांचे नेतृत्व करणारे कोणीतरी धाडसी भेटले ह्या उद्देशाने कंधार लोहा तालुक्यातील अनेक माजी सैनिक बालाजी चुक्कलवाड यांचे नेतृत्व मान्य केलं. उपजिल्हा रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी अनेक आंदोलने केली यामध्ये आत्मदहन करण्याचाही माजी सैनिक बालाजी चुक्कलवाड यांनी प्रयत्न केला . या प्रयत्नामुळे अनेक राजकीय लोकांचे धाबे दनावले . या रुग्णालयाला आज कायद्याने नाव मिळाले नसले तरीही या नावाचे प्रोसिजर मंत्रालयापर्यंत जाऊन पोहोचले आहे.
माजी सैनिक संघटनेचे बालाजी चुक्कलवाड यांनी शेतकरी कामगार शेतमजूर विद्यार्थी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक आंदोलने केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे काम केले. त्यांचे सर्वात जास्त आंदोलन गाजलं ते म्हणजे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता करा. या मागणीसाठी त्यांनी एक मोठा आंदोलन उभा केलं होतं परंतु या आंदोलनामध्ये राजकीय नेत्यांनी मिठाचा खडा टाकून हे आंदोलन मोडीत काढून बालाजी चुक्कलवाड यांची कोंडी करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळींनी केला. आंदोलनात फूट पडल्याने काही उपयोग होणार नाही कारण कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही आणि कायदा कोणाच्या बापाचा नाही ही भूमिका घेऊन त्यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा केला. आज हे प्रकरण शासन दरबारी असून जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ज्यावेळेस महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता होईल या रस्त्याचे सर्वश्रेय मेजर बालाजी चुक्कलवाड यांना असतील यात तीळ मात्र शंका नाही..
समाजसेवा करतच त्यांनी आपले गाव सुधारले पाहिजे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अनेक वर्षांपासून गावात चालत असलेली जातियवादाची परंपरा मोडीत काढली. सर्व गावकऱ्यांना एकत्र बसवून पहिल्यांदाच पातळगंगा येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढून राजकीय पुढार्यांच्या नाकावर डिच्चु मारला. जात-पात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन गावचा विकास कसा झाला पाहिजे यासाठी सर्व तरुणांना एकत्र करण्याचे काम मेजर चुक्कलवाड यांनी केले आहे. स्पर्धेच्या युगात जगत असताना या गावात मोबाईलची सेवा कोणतीच उपलब्ध नव्हती चुक्कलवाड यांनी सातत्याने प्रयत्न करून गावात पहिल्यांदा मोबाईल टावर आणण्याचे मोठे काम केले. वीज, नाली, रस्ते पाणी या सर्व मूलभूत सुविधा गावातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने मेजर चुक्कलवाड प्रयत्न केले. विकासाबरोबरच गाव निर्व्यसनी झालं पाहिजे यासाठी व्यसनमुक्ती हा नियमही गावासाठी लागू केला. उपसरपंचाची जबाबदारी बजावत असताना चुक्कलवाड यांनी सरपंच राजु मुंडे यांच्या सहकार्याने गावात जवळपास अडीच कोटी रुपयांचे विकास कामे केली.
मेजर बालाजी चुक्कलवाड यांनी आपल्या धाडसी निर्णयातून अनेक शासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्यांचे घोटाळे जनतेसमोर आणले. एखाद्या कार्यालयात गोंधळ घालत असताना कधीच कायद्याचे विचार केला नाही किंवा आपल्यावर कोणते गुन्हे दाखल होतील याची त्यांनी कधीच परवा केली नाही. काम करत असताना त्यांनी आपले हात नेहमी स्वच्छ ठेवून काम केले आहे त्यामुळे आजही शासकीय कार्यातील अधिकारी हे बालाजी चुक्कलवाड यांना घाबरत असतात.
कंधार तालुक्यातील आज कोणत्याही कार्यालयात एखाद्या सामान्य शेतकऱ्यांचे शेतमजुराचे किंवा नागरिकाचे काम होत नसेल तर ते आवर्जून बालाजी चुक्कलवाड यांना फोन करतात आज त्यांच्याकडे कोणतेच पद सत्ता नसताना त्यांनी केवळ माजी सैनिकाच्या पदावरच आपलं स्वतःचं धाडसी अस्तित्व निर्माण केला आहे. मेजर चुक्कलवाड हे राजकीय व्यक्तिमत्व नसलं तरीही लोहा आणि कंधार तालुक्याच्या विकासासाठी राजकारणात उतरण्याचं एक पाऊल त्यांनी समोर टाकला आहे. आज त्यांना राजकारणात म्हणावा तसं यश मिळालं नसलं तरीही भविष्यात त्यांना राजकीय दरवाजे खुले राहू शकतात असं म्हणलं तरी काही वावग ठरणार नाही.
आज मेजर बालाजी रामप्रसाद चुकुलवाडी यांचा 42 वा वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आई जगदंबा तुळजाभवानी सहदेव त्यांच्या पाठीशी राहो आणि त्यांचे पूर्ण मनकामना पूर्ण हो हीच तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना.


