वीस पंचवीस वर्षाचा सोबती असलेला गंगाधर दादा गेल्याची बातमी एवढ्यात कळाली आणि त्याचा हसमुख चेहरा सर्रकन डोळ्यासमोर आला. मरणाला सतत कोलणारा गंगाधर दादा आज त्याच्या तावडीत सापडला. अकरा तारखेला भेटला होता. महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याला अभिवादन करायला अलयावर मागच्या बाजूने येऊन हळूच कानात म्हणाला काय म्हणले फुले. मी वळून बघितलं आणि तू वश व्हय असं म्हणत नाही अजून गेलो नाही त्यांच्याजवळ असं म्हणत आमच्या गप्पांना सुरुवात झाली. भेटला की सीमा मर्यादा सोडून दिलखुलास बोलायचा. मुळात तो त्याच्या दुनियेत नेहमी तल्लीन असायचा त्याला काही घेणं देणं नसायचं दुनियादारीचं. अनेक स्मरणीय आठवणी आहेत. कोविड काळात तो सरकारी दवाखान्यात ऍडमिट होता. माझी माय तिथेच होती. त्यामुळे मी सरकारी दवाखान्यात. याचकडचे पाणी संपलेले मला फोन आला सुखदेवचा म्हणाला दादा तिथे आहे. काही तरी अडचण आहे तुला फोन येईल . थोड्यावेळाने त्याच्या घरून फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडचे पाणी संपले आहे. तुम्ही तिथे आहात तर त्यांना तेवढे पुरवा. मुळात तो तिथे आहे म्हणजे मला जायचेच होते. पण त्याला कारणही लागले . आणि मी त्याला शोधत शोधत कोव्हिड वॉर्ड मध्ये गेलो. तसे तिथे जाता येत नव्हते पण मी कसाबसा गेलो. बघतो तो काय पठ्या मास्क बिस्क न लावता बसलेला बिनधास्त. अन् मला म्हणाला तू कस काय?
मी म्हणलो हे घे पाणी. तुझं पाणी संपलाय ना..
पाण्याचा बॉक्स दिला म्हणलं काही लागेल तर मला फोन कर आई आहे इथेच त्यामुळे मी आहे. थोडा वेळ थांबलो. तेवढ्या वेळात त्याने वॉर्डातील अनेकांची मजा घेतली . म्हणाला मी मरत नाय बे.. तूला माहित आहे. कारण अनेकदा मरणाच्या दाढेतून परत आलेला तो.. आज मात्र त्याला मरणाने गाठले . खूप मोकळा, दिलदार आणि खरच नेहमी भावासारखा असणारा दादा आज गेला…
दादा तुझा मजाकी, हसरा चेहरा नेहमी स्मरणात राहील…
जड अंतःकरणाने तुला भावपूर्ण श्रद्धांजली..
Miss you dear…..
श्याम कांबळे यांच्या Fb wall वरून

