मुखेड: (दादाराव आगलावे)
एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे पहिले संस्कारपीठ. आज एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन झाल्यामुळे समाज अध:पतनाकडे आहे. स्वैराचार, दंभाचार, भ्रष्टाचार आणि हिंसाचार यामुळे कुटुंब व्यवस्था कोलमडीस आलेली आहे. प्रत्येक कुटुंबात ही समस्या आहे. आई-वडील, मुलं-मुली, पती-पत्नी भाऊ-बहिण आदि नात्यांत दुरावा आला आहे. कुटुंब व्यवस्थेचे जतन झाले तरच जीवनाची मूल्यं टिकतील असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील (गारगोटी, जि. कोल्हापूर) यांनी “चला कुटुंब जपूया” या विषयावर मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचे 14 वे पुष्प गुंफताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र येवती मठसंस्थानचे मठाधिपती श्री श्री सदगुरु नराशाम महाराज होते. तर व्यासपीठावर गणाचार्य मठ संस्थानचे विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, श्री संत नामदेव महाराज दापकेकर, नगराध्यक्षा विजया देबडवार, ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल मुलुंड (मुंबई) येथील डॉ. संदीप बालनराव गोरे, तेर येथील ज्येष्ठ कवयित्री जनाबाई (राजश्री) फासे यांच्यासह व्याख्यानमाला संयोजन समितीचे प्रमुख डॉ. दिलीप पुंडे, सौ. माला पुंडे, संजय पुंडे, बालन गोरे, सौ. मंगला गोरे, डॉ. गौरव पुंडे, डॉ. सौ. तेजस्विनी पुंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. वंदे मातरम या गीताने व सावित्रीबाई फुले तसेच मातोश्री भिमाबाई व पांडुरंगराव पुंडे यांच्या प्रतिमा पूजनानंतर दीप प्रज्वलन करून व्याख्यान पुष्पाची सुरुवात करण्यात आली.
युवराज पाटील पुढे म्हणाले की, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे घराघरातील संवाद कमी झाला आहे. तरुणाई ही विभक्त कुटुंब पद्धतीकडे वळली आहे. व्यसनाधीनता, मुलांवरील संस्काराचा अभाव, करिअरच्या नादात कुटुंबाला वेळ न देणे आदि गोष्टींमुळे घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे. पालक आणि पाल्य यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. मोबाईलच्या युगात, मानवी स्पर्श कमी झाल्यामुळे नात्यातला ओलावा संपत चालला आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढते आहे. आजी-आजोबा, आई-वडील ही खरी घरातील संपत्ती आहे. त्यांच जतन होणं आणि त्यांचं मार्गदर्शन आणि अनुभव यांचा समन्वय साधला तरच जीवन सुखकर होईल. कुटुंब जपणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि आणि कुटुंबाचं जतन झालं तरच जगण्यात सुख समृद्धी आणि शांती येईल. या शानदार सोहळ्यात ग्लोबल एक्सपर्ट इमर्जन्सी मेडिकल फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड (मुंबई) येथील डॉ. संदीप बालनराव गोरे यांना ‘गुरुवर्य पांडुरंगराव पुंडे स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, मानपत्र व ११ हजार रुपयांची रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच ‘तेर’ येथील ज्येष्ठ कवयित्री सौ. जनाबाई (राजश्री) फासे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. दिलीप पुंडे म्हणाले की, आज व्याख्यानमाला चालवणे हे अत्यंत कठीण झाले आहे. पाणी घुसळले की वीज तयार होते ,ताक घुसळले की लोणी तयार होते आणि विचार घुसळले तर विवेक जागा होतो. सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक आणि आरोग्य विषयांवर विचार मंथन होऊन प्रबोधन व्हावे या हेतूने हा सारा प्रपंच आहे. श्रोता या कार्यक्रमाचा खरा गाभा आहे.
समाजात विचार पेरणे अत्यंत अवघड झाले आहे पण विकार क्षणात पेरल्या जातात. आपण सर्वांनी या विचार दिंडीचे पाईक व्हावे असे आव्हान त्यांनी केले. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. संदीप बालन गोरे , फोर्टिस हॉस्पिटलचे आपत्कालीन वैद्यक यांनी स्वतःचा जीवन प्रवास मांडला. उच्च ध्येय, अभ्यास, सातत्य आणि सदैव शिकत राहणे हे उत्कृष्ट वैद्यकाचे लक्षण आहे. माझ्या मायभूमीतला सत्कार हा माझ्यासाठी अनमोल आहे. डॉ. हिम्मतराव बावस्कर आणि डॉ. दिलीप पुंडे हे माझे आदर्श आहेत. आपल्या भागात नैसर्गिक आपत्ती आल्यास आपण साद द्यावी आम्ही तातडीने प्रतिसाद देऊ व सेवा देऊ असे अभिवचन त्यांनी दिले. डॉ. सौ. तेजस्विनी गौरव पुंडे यांनी वक्त्यांचा परिचय दिला व क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाल्या की, जागतिक महिला दिन हा केवळ प्रासंगिक झाला आहे. निसर्गाने मूलतः स्त्रियांना निर्मितीची शक्ती दिलेली आहे त्यामुळे तिचे स्थान सदैव उच्च आहे. मानपत्राचे वाचन साहित्यिक शिवाजी अंबुलगेकर यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना सद्गुगुरू नराशाम महाराज म्हणाले की, अध्यात्म आणि विज्ञान यांचा योग्य समन्वय साधला तरच जीवन समृद्ध होईल .तसेच महाभारतातील उदाहरणे देत कुटुंबातील नातेसंबंध जपण्याचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी नामदेव यलकटवार यांनी व्याख्यानमालेवर काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांनी केले, तर आभार डॉ. गौरव पुंडे यांनी मानले. कार्यक्रमास व्यंकटराव पाटील दापकेकर, पंचायत समितीच्या माजी उपसभापती अरुणाताई दापकेकर, प्रसिद्ध वक्ते श्रीहरी वेदपाठक, श्री खंदाडे, बाळासाहेब फासे, राहुल गोरे, हणमंतराव मस्कले, सदाशिव पाटील चिवळीकर, डॉ. एम.जे. इंगोले, डॉ. आर. जी.स्वामी, डॉ. वीरभद्र हिमगिरे, डॉ.अशोक कौरवार, डॉ. रामराव श्रीरामे, डॉ. पांडुरंग श्रीरामे, डॉ. अमित मस्कले, डॉ. नितीन आंबेकर, डॉ. मुकुल गोपूलवाड, डॉ. शारदा हिमगिरे, सौ. कुसुम चांडोळकर, डॉ.ज्योती मस्कले, सदाशिव पाटील जाधव, प्राचार्य शिवानंद अडकिने, माजी प्राचार्य देविदास केंद्रे, सत्यवान गरुडकर, नगरसेवक विनोद आडेपवार, हेमंत घाटे, करण रोडगे, नगरसेविका सौ.रंजना कोत्तापले, शौकत होनवडकर, डॉ.राहुल कांबळे, पत्रकार यशवंत बोडके, संपादक ज्ञानेश्वर डोईजड, पत्रकार राजेश बंडे, दत्तात्रय कांबळे, मिलिंद कांबळे, मुजीब सय्यद, किशोर संगेवार, किशोर चव्हाण, डॉ. अविनाश पाळेकर, डॉ सतीश बच्चेवार, डॉ. श्रीहरी बुडगेमवार, डॉ. माधवी सुभेदार, डॉ. कैलास पाटील डॉ. संदीप ढगे , डॉ. रचिता कौरवार, डॉ. किरण ठाकरे, डॉक्टर उमेश पाटील, डॉ. आरती पाटील, सुप्रभात मित्र मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण पत्तेवार, जीवन कवटीकवार, अशोक कोत्तावार, उत्तम कुलकर्णी, नंदकुमार मडगुलवार, मेडिसन फार्माचे रमेश मेगदे, मैनोद्दीन पिंजारी,
कांचनगिरे, डॉ.तायडे, डॉ. संजय लाडके, महेश पत्तेवार, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष जय जोशी, बलभीम शेंडगे, आगार सहाय्यक नरसिंग कोरे, मानवता विचार मंचचे बालाजी लिंगनवाड, संग्राम मस्कले, मुख्याध्यापक शिवाजी डावकरे, ॲड .बालाजी बंडे, मुख्याध्यापक संग्राम शिंदे, किशनराव आगलावे, चंद्रकांत तेलंगे, भाई चंद्रकांत गरुडकर, सुरेश गरुडकर, आर.बी. जाधव, नामदेव सूर्यवंशी, संतोष तळेगावे, नारायणराव बिलोलीकर, लक्ष्मीकांत चौधरी, शिवाजी कोनापूरे, दिनेश चौधरी, प्रवीण कवटीकवार, बालाजी वट्टमवार, बालाजी देबडवार, शंभूशेठ कवटीकवार, सुर्यकांत कपाळे, गजानन बंडे, लक्ष्मीकांत कवटीकवार यांच्यासह मातोश्री भीमाई व्याख्यानमालेचे सदस्य, सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य, जिप्सी मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, पुंडे हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी, अनेक डॉक्टर्स, पत्रकार, वकील, माय मराठी कंधार व मुखेडचे सर्व सदस्य, डॉ.संदीप गोरे यांचे मित्रमंडळ, मुखेड येथील अनेक सेवाभावी संस्थेचे सदस्य, रोटरी क्लब मुखेड, स्वामी समर्थ सेवेकरी, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार तसेच कंधार, जांब आणि मुखेड शहरासह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पसायदान गायनाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार दादाराव आगलावे, शिवाजी आंबुलगेकर, डॉ. बदने, एकनाथ डुमणे, बलभीम शेंडगे , सुप्रभात मित्र मंडळाचे सदस्य व पुंडे हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

