कंधार : प्रतिनिधी
खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी शेतीच्या मशागतीला लागला असून बोगस खत व बी- बियाणे बाजारात आल्याच्या चर्चामुळे शेतकरी धास्तावला आहे.या समस्याकडे लक्ष
वेधण्यासाठी शिवसेना तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव यांनी तालुका कृषी अधिकारी कंधार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली की, प्रमाणित निवीष्ठाची भाव फलक दुकानाच्या दर्शनी भागावर आज तारखेपर्यंत लावले नसल्यामुळे बोगस बियाने व रासायनिक खते, औषधी बाजारत पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची फसवणुक होण्याची दाट शक्यता असल्यामुळे बोगस खत व बी बियाणे यांचे नावे तालुका कृषी अधिकारी यांनी सार्वजनिक करावे.. आशा प्रकारचे बोगस खते व बियाणे बाजारात मोठ्या प्रमाणवर विक्रीस आल्याची चर्चा असल्यामुळे, उत्पन्न खर्चावर मालाला योग्य हामीभाव मिळत नसल्यामुळे कर्जाच्या भीतीने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल त्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच दुकानांवर खते व बी-बियाणे साठवणूक करुन ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर तत्काळ बंदोबस्त करावा. तसेच अशा दुकांनांची तपासणी करून प्रमाणित निविष्ठाचे दुकानाच्या दर्शनी भागावर भाव फलक लावावे व अप्रमानीत बियाणे आणि खताचे न प्लॉट क्रमांक ,कंपनीचे नाव यांची माहिती वृत्तपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक करावी. अन्यथा, शिवसेना शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा दिला आहे.
या निवेदनावर तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव,तालुका संघटक पंडितराव देवकांबळे , उपतालुकाप्रमुख विश्वनाथ पवार, किसान सेना प्रमुख शिवाजी कदम, सर्कल प्रमुख जी एम पवळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

