(शिवाजीराव कंचेवाड येवतीकर सर आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख देत आहोत. -संपादक)
सेवानिवृत्ती प्रत्येकाच्याच जीवनात येणार आहे जे टाळता येत नाही. शिवाजीराव येवतीकर सरांचे विद्यार्थी आज समाजात डॉक्टर इंजिनियर सरकारी कर्मचारी अधिकारी म्हणून वावरत आहेत आजचा हा सरांचा निरोपाचा समारंभ नसून त्यांच्या प्रतीचा कृतज्ञता सोहळ्याचा आहे. आदरणीय येवतीकर सर यांनी मुखेड पंचायत समिती शिक्षण विभागासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तन मन लावून कार्य केलेले आहे. केवळ नोकरी म्हणून त्यांनी ही जबाबदारी पार पाडलेली नसून आपले जीवन ध्येय समजून आपली सेवा पूर्ण केलेली आहे. सरांचे अध्यापन कौशल्य विषयावरील प्रभुत्व आणि विद्यार्थ्यांसाठीची व शिक्षक व शिक्षिकेसाठी आत्मीयता या गोष्टी मला अनुकरणी वाटतात. नियमांच्या चौकटीत राहून प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडण्याची त्यांची वृत्ती राहिलेली आहे. आपल्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या प्रति सहकार्याची भावना यातून कितीतरी स्नेहाची आपलेपणाची नाती त्यांनी निर्माण केलेली आहेत. मलाही लावलेपणा लावले असल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. बऱ्याचदा अधिकाराच्या पदावर असताना कर्तव्याचा भाग म्हणून त्यांनी कठोर वर्तन दाखवलेही असेल परंतु त्यांच्या मनात कोणाही साठी कडूदा राहिलेली नाही हे आपण जाणतोच. कुठेही शाळा कॉलेजही दगड विटांची इमारत नसते तर त्या शाळेचे शिक्षक विद्यार्थी कर्मचारी हे त्या शाळेचा खरा आत्मा शिक्षक आणि विद्यार्थ्यांशिवाय शाळेला काही अर्थ नसतो आणि अनुभवांची जागा जगातली कुठलीही गोष्ट घेऊ शकत नसते म्हणूनच जेव्हा कुठले अनुभवी अधिकारी शाळेला सोडून जातात तेव्हा शाळेचे काही अस्तित्व असते आपल्या सोबत नेत असतात.
सरांच्या निवृत्तीनंतर सरांचे पोकळी आम्हाला कायमच जाणवत राहणार आहे आपल्या सेवाकाळात वेळेच्या कमतरतेमुळे सर बऱ्याचदा आपल्या परिवाराला आपल्या आरोग्याला आणि आपल्या छंद्यांना वेळ देऊ शकेल नव्हते ती अमूल्य अशी वेळ त्यांच्याजवळ आता असणार आहे या गोष्टीचा नक्कीच आनंद वाटतो. आपल्या निवृत्तीनंतरची दुसरी इनिंगही सर अंगभूत आत्मविश्वासाने आणि कर्तबदारीने यशस्वी करून दाखवतील यात तिथे मात्र शंका नाही. मार्गदर्शन यापुढेही आम्हाला असेच मिळत राहील. आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यातून सामाजिक उत्तरदायित्व व जबाबदारी यांची जाणीव ठेवून नवीन पिढीतील शिक्षकांना सतत प्रेरणा व मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री शिवाजीराव येवतीकर.
आपल्या 38 वर्षाच्या शिक्षक,केंद्रप्रमुख ते प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी अशा प्रदीर्घ व अविरत सेवाकार्यातून ते दि. 31 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. साधारणपणे डॉक्टर इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करावं या विचाराने त्यांनी दि.सप्टेंबर 1987 पासून शिक्षक म्हणून आपल्या सेवाकार्यास सुरुवात केली.
दळणवळण, शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या फारशा सुविधा शाळेत उपलब्ध नसतांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेकविध उपक्रमांचे आयोजन करून शाळेत विद्यार्थी उपस्थिती वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अल्पावधीतच 1997 साली केंद्रप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आल्यानंतर त्यांनी आजतागायत 28 वर्षांपेक्षा जास्त काळ ती जबाबदारी समर्थपणे पेलून आपल्या कार्यकर्तृत्वातून शैक्षणिक व सामाजिक नवीन पिढीपुढे आदर्श निर्माण केला आहे. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असतानाच विविध क्षेत्रातील देण्यात आलेल्या जबाबदाऱ्याही त्यांनी नेटाने सांभाळल्या आहेत. त्यातून त्यांनी आपल्यातील कार्यक्षमतेचा परिचय करुन दिला आहे. विविध जिल्हा- तालुकास्तरीय प्रशिक्षणात, सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमात क्षेत्रीय अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. विभागीय आयुक्त व्ही.रामणी यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानात त्यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सन्मानित केले आहे. किनवट, माहूर यासारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात एक तपाहून जास्त काळ त्यांनी सेवा केली असून आपल्या अधिनस्त शाळांत शैक्षणिक पर्यवेक्षणाचे कार्य करतांना गावातील पालक व शिक्षक यांच्यात सुसंवाद साधून शाळा विकासात लोकसहभाग प्राप्त करण्यास त्यांनी नेहमीच प्राधान्यक्रम दिला आहे.सर्वसमावेशक व समर्पित भावनेने काम केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा अजातशत्रू म्हणूनही आदराने उल्लेख केला जातो. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडे प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आलेली असून ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक विविध स्पर्धा परीक्षांचे यशस्वी आयोजन, पालकांचे उद्बोधन, गुणवंतांचा सन्मान, विद्यार्थी हिताच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले आहेत. हर घर तिरंगा, वृक्षारोपण, लसीकरण, जनगणना, रक्तदान, कोविड-19 संक्रमण काळात विविध जबाबदाऱ्या सांभाळणे अशा विविध राष्ट्र उभारणीच्या कार्यातही त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
आपल्या प्रदीर्घ सेवाकार्यातून श्री शिवाजीराव येवतीकर सर 31 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचे सेवानिवृत्तीचे कार्य सर्वांना सांभाळून घेऊन चालणारे असावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो
–दादाराव आगलावे, मुखेड.
शब्दांकन -डॉ. शिवाजी कराळे, ‘मल्हार’ श्रीनगर मुखेड जि. नांदेड.

