लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाव
येथील माळरानावर रवि बापटले या धेय्यवेड्या माणासाने ” सेवालय ” या सेवाभावी संस्थेच्या
माध्यमातून एड्सग्रस्त मुला मुलींच्या पुनर्वसनासाठी
जवळपास दोन दशका पुर्वी काम सुरू केले आहे. त्यांना सन्मान पुर्वक जगता यावे, त्यांना शिक्षण
मिळावे,निवारा मिळावा,समाजात प्रतिष्ठा मिळावी
या ऊद्दात हेतूने सुरू केलेले कार्य अल्पावधीतच
नावारूपाला आले.अनेक संकटाना तोंड देत त्यांनी सेवालय ही संस्था नावारूपाला आणली..!!संपूर्ण लातूर जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात ,
राज्यातच नव्हे तर देशभरात सेवालयाची स्वतःची ओळख निर्माण केली.हे वास्तव कोणीही नाकारू
शकत नाही.म्हणूनच त्यांना अल्पावधीतच या कामा
साठी मदत करना-या अनेक दानशूर व्यक्ती मदती
साठी पुढे आल्या.सोबतच अनेक हितचिंतक,स्नेही पाठीराखे निर्माण झाले व सेवालयाचे नाव सर्वदूर पोहोचले.त्या बरोबरच रवी बापटले हे नाव स्वयंसेवी
संस्थांच्या जगतात जगभरात पोहोचले.माझ्या अनेक मित्रांच्या तोंडून ते ब-याचदा मला ऐकायला मिळाले. चा़ंगल्या कामाचे जसे जसे कौतुक व्हायला लागते
त्याची लोकप्रियता वाढत जाते तसे तसे त्याचे अनेक
विरोधक ही वाढत जातात हा माझा स्वयंसेवी संस्था
मधे कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाचा मला
आलेला अनुभव आहे.जसा तो मला आला तसा तो ईतर अनेकाना आला असावा.अनेक विघ्नसंतोषी लोकांना चांगले चालले काम पाहवत नाही.आपण काहीच करायचे नाही व
दुसरे कोणी चांगले काम करत असेल तर त्याला
नावे ठेवायची.अशी पृवृती आपल्या समाजात फार पूर्वीपासून चालत आलेली पाहायला मिळते.चांगले
काम करणा-याना बदनाम केले जाते.त्यांच्या बाबत
लोकामधे गैरसमज निर्माण केले जातात.अशी अनेक
उदाहरणे देता येतील.पण आज या लेखात मी जी
चर्चा करणार आहे ती रवी बापटले यांच्या बाबतीत
जो प्रसंग नुकताच घडला त्याची..!!रवी बापटले यांच्या वर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.ही बातमी
वा-या सारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली.
मन सुन्न झाले मेंदु बधीर झाला.अस कसं होवू शकत?
या वर विश्वास ठेवायला मन धजावत नव्हते.पण जो
पर्यंत याची शहानिशा होत नाही.तो पर्यंत मनाची
द्विधा अवस्था संपत नाही.हे ही तेवढेच खरे..!!वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या, त्यावर रवी
बापटले यांनी केलेला खुलासा तक्रारदाराने बदलेला जबाब या वरून हे सगळं प्रकरण संशयास्पद आहे असे वाटण सहाजिक आहे.असेच सुकृत दर्शनी
वाटते कालांतराने वास्तव समोर येईलच.खरे तर पोलीसांनी तक्रारीची कुठलीच शहानिशा न करता
गून्हा नोंदवला आहे.रवी बापटले हा यात मुख्य
आरोपी नाही.गुन्हा उघडकीस येवू नये म्हणून त्यांनी
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असे तक्रार दाखल
करणा-याचे म्हणणे आहे.तरी पण पोलिसांनी रवी
बापटले यांना ज्या तत्परतेने अटक केली त्या सर्व गोष्टी पाहता याच्या पाठीमागे षडयंत्र असावे असा संशय निर्माण होतो.अस माझं वैयक्तिक मत बनले
आहे.ते सत्यच असेल असा माझा दावा नाही.पण
त्यात कुठे तरी पाणी मुरतय अशी शंका येतेय.हे पण
नाकारता येत नाही.एखादी संस्था,कार्यकर्ता जसा जसा नावारूपाला येत जातो तसे तसे त्याला बदनाम करण्याचे प्रयत्न अनेक पातळ्यांवर केले जातात.त्याचे पंख छाटन्याचे काम काही विघ्नसंतोषी लोक
करत असतात कधी असूया,द्वेष, तर कधी ईर्षे पोटी.! हे सगळ घडवून आणले जाते.याचा अनुभव मी
जवळून घेतला आहे म्हणून मला असे वाटते की
असाच प्रकार रवी बापटले व सेवालयाच्या बाबतीत
घडला असावा असा निष्कर्ष या क्षेत्रात जवळपास
दिड दोन दशके काम केलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याने वृत्तपत्रात आलेल्या बातम्या व सोशल मीडियावर चालू असलेली चर्चा पाहुन काढला तर ते चुकीचे ठरणार नाही याची मला खात्री वाटते..!!सेवालयाचे हितचिंतक, रवीचे अत्यंत जवळचे मित्र जेष्ठ पत्रकार महारुद्र मंगनाळे सरानी या बाबतीत
सोशल मीडियावर लीहले त्या वेळी रवी बापटले
यांना या प्रकरणात गोवले असल्याची शंका आणखी
गडद वाटायला लागली.ज्या प्रकारे गुन्हा नोंद झाला.
गुन्हा नोंद होण्यापूर्वी कुठलीही खातरजमा केली गेली
नाही.अचानक पोलिस येतात आणि रवीला अटक
करुन घेवून जातात.कोर्टासमोर उभं करतात माननीय
कोर्ट दोन दिवसांची पोलीस कस्टडी देते लगेचच
वृत्तपत्रातातून बातम्या प्रसिद्ध होतात.त्यामूळे रवी
व सेवालयाच्या बाबतीत लोकामधे संशय निर्माण
होतो लोक उलट सुलट चर्चा करतात.खरे काय.?
खोटे काय.? याची शहानिशा करायला कुणाकडेच
वेळ नसतो.कुणालाच त्याची गरज पण वाटत नसते
हा जसा सार्वत्रिक अनुभव आहे तसा तो मी आणि
माझ्या सहकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्थेमधे काम करत
असताना घेतला आहे.म्हणुनच आपण ही या वर
चार शब्द लिहावे ते आपले कर्तव्य आहे असे कुठे
तरी मन सांगत होते म्हणून हा लेखनप्रपंच..!!आज समाजात सेवाभावी वृत्तीने झोकून देवून काम
करना-या संस्था,अपवादानेच पाहायला मिळतात.
त्याला कारणेही अनेक आहेत.२०१४ ला केंद्रात
भाजपचे सरकार आल्या पासून त्यांनी स्वयंसेवी
संस्थेच्या संदर्भात असलेल्या कायद्यात अनेक बदल
केले त्याचा परिणाम म्हणून अनेक स्वयंसेवी संस्थांनी
आपला गाषा गुंडाळल्याचे पाहायला मिळते.ज्या
काही थोड्या फार हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था अजुनही काम करताना दिसतात.त्या पैकी अनेक संस्था सरकारची मर्जी सांभाळून काम
करतात त्या सरकारच्या मर्जीवर टिकून आहेत.पण काही अपवादात्मक अशाही संस्था आहेत की ज्या
आपल्या कामाच्या जोरावर, विशिष्ट ध्येयाने प्रेरित
होऊन काम करतात त्या साठी त्यांना सरकार
मदत करो अथवा न करो त्या आपले काम करत राहतात.आपल्या कामावर प्रेम करणारे सहानुभूतीदार
हितचिंतक, देणगीदार,यांच्या मदतीने काम करताना
दिसतात.खरे तर त्यांचे कौतुकच करायला हवे..!!
अशा संस्था म्यानेज होत नाहीत सत्ताधाऱ्यांचे हितसंबंध सांभाळत नाहीत मग अशा संस्थांना
सत्ताधाऱ्यांचे बगलबच्चे खोटे नाटे आरोप करून त्यांना अडचणीत आणण्यासाठी कार्यरत असतात.
त्या साठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला जातो.
कधी संस्थेवर आर्थिक अनागोंदीचे आरोप केले
जातात तर कधी संस्थेच्या कार्यकर्त्यांना खोट्या
गुन्ह्यात अडकवले जाते, धमक्या दिल्या जातात.
एवढे करूनही जर ते ऐकतच नसेल तर संस्थेतीलच
एखाद्या व्यक्तीला फोडून आर्थिक अमिष दाखवून लैंगिक शोषणाचे आरोप केले जातात हे जसे
समाजकारणात घडते तसेच ते राजकारणात ही
घडते हे वास्तव नाकारता येत नाही..!!जशी ही एक बाजू झाली तशीच संस्थे अंतर्गत वाद
विवादही असु शकतात.आर्थिक हितसंबंधांना धक्का
पोहचला की संस्थे मधीलच काही कार्यकर्ते, ट्रस्टी
नाराज होवून षडयंत्र रचतात संस्थाप्रमुखाला बदनाम
करतात.असाही अनुभव मी जवळून पाहिला आहे.
हे जरी वास्तव असले तरी प्रश्न उरतो तो या पृवृतीचे
काय करायचे? अशा प्रकारातून जी कार्यकर्त्याची,
संस्थेची,बदनामी होते ती कशी भरून निघणार.!
कोर्ट केसेस मुळे झालेला मनस्ताप, वर्षानुवर्षे निकाल
लागे पर्यंत कोर्टाच्या कराव्या लागणाऱ्या तारखा,
त्या साठी वेळेचा होणारा अपव्यय व यातून होणारे
कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण असे गुंतागुंतीचे अनेक प्रश्न निर्माण होतात खरे तर हे ज्याने प्रत्यक्षात अनुभवलेले असते तो कार्यकर्ता कोलमडून पडतो.काही अपवादात्मक कार्यकर्ते या वर ही मात करतात
यातून आलेल्या अनुभवावरून ते अधिकाधिक खंबीर
होतात जस अग्नीतून सोनं झळाळून निघते तसेच.
मला खात्री आहे की रवी बापटले व सेवालय देखील
यातून बाहेर पडेल.आज नाही तरी ऊद्या रवी बापटले
यांच निर्दोषत्व सिध्द होईल.ते या संकटातून तावून
सुलाखून बाहेर पडतील असा विश्वास वाटतो.व पुन्हा
सेवालय आपल्या कामाच्या जोरावर किर्तीचे नवे नवे
उच्चांक सामाजिक क्षेत्रात निर्माण करेल अशी अपेक्षा करूयात.!!पण त्या बरोबरच मनाला ही खंतही राहील की अशा
उपद्रवी,विकृत लाचार स्वतःच्या स्वार्थासाठी खालच्या
पातळीवर जाऊन बदनाम करना-या पाताळयंत्री
लोकांना धडा शिकविण्यासाठी ज्या प्रकारे लोकांनी
पुढे यायला पाहिजे होते तसे होताना काल हि दिसत
नव्हते आज ही दिसत नाही.स्वंयसेवी संस्थांना काही
संस्था प्रमुख आपल्या कुटुंबाची जहागीर समजतात.
तर काही संस्था चालक त्याला आपल्या जगण्याचे
साधन समजतात.त्यामुळे जे लोक समाजातील
ऊपेक्षीत, वंचित व समाजाने विविध कारणांमुळे
नाकारलेल्या लोकांना दिलासा मिळावा.त्याना माणूस
म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा.या साठी
काम करतात अशा लोकांना त्रास दिला जातो.हे
वास्तव नाकारता येत नाही..!!खरे तर असा त्रास होणार नाही या साठी समाजातील विचारवंत,बुध्दीवंत लेखक, साहित्यिक यांनी प्रयत्न
करायला हवे अशी अपेक्षा एक कार्यकर्ता म्हणून
त्यांच्या कडून अपेक्षा केली तर ती चुकीची ठरणार
नाही.खरे तर सुरक्षा कवच पांघरून बसलेल्या स्वयंसंस्था चालकानी हे लक्षात घ्यायला हवे की अशी
वेळ त्यांच्या वर ही येवू शकते.म्हणून वेळीच या सुरक्षा कवचातून बाहेर पडुन आपल्या सहका-यावर
मित्र संस्थेवर सुडबुध्दीने केलेल्या कारवाईचा निषेध
करण्या साठी पुढे यायला हवे होते पण असे होताना दिसले नाही हे खेदाने म्हणावे लागते.
मी व माझे सहका-यानी अशा प्रसंगाचा अनुभव
घेतला आसुन त्यातून जो बोध घेतला.त्याचे परीणाम चळवळीवर झाले चळवळ मोडीत निघाली.असा प्रकार सेवालयाच्या व रवी बापटले यांच्या बाबतीत घडु नये.स्संथेत आज घडीला जे एचआयव्ही बाधित मुले मुली राहतात ते उघड्यावर येणार नाहीत या
साठी रवी बापटले व सेवालयाला आधार देणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.या निमित्ताने
मला माझ्या अनुभवावरून म्हणावे वाटते की ” जावे
त्याच्या वंशा तेव्हा कळे “..!! रवीजी काळजी करु
नका खचुन न जाता हिमतीने या प्रसंगाला सामोरे जा
आम्ही आपल्या सोबत आहोत यावर येणारा काळच त्याना योग्य ते उत्तर देईल..!!तुर्तास एवढेच.रवि बापटले या प्रकरणातून निर्दोष बाहेर पडतील.व पुन्हा नव्या उमेदीने कामाला
लागतील अशी अपेक्षा व्यक्त करुन हा लेखनप्रपंच
इथेच थांबवितो..!!सुनील खंडाळिकर..
अहमदपूर जी लातूर.
९०११८०४८२८

