कंधार (प्रतिनिधी) – कंधार तालुक्यातील बारूळ गावाला जोडणारे चारही बाजूचे रस्ते मागील पंधरवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अत्यंत खराब झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील नागरिक व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांना रस्ते दुरुस्तीसंदर्भात निवेदन दिले.
या वेळी ॲड. विजय पाटील धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली एस. पी. जाधव, उदय पाटील जाधव, जयराम कांबळे, शरद भागानगरे आदींसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
गावकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

