‘हैदराबाद गॅझेट’ (Hyderabad Gazette) नुसार बंजारा समाजाला आदिवासी Tribe प्रवर्गात ओळख दिली गेलेली आहे,आणि त्यावर आधारित महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाने एसटी आरक्षणाची मागणी केली आहे.अर्थात,हा दावा अनेक माध्यमांमध्ये केला जात आहे.हा दावा खरा की खोटा हे गॅझटचं अभ्यास तज्ज्ञ लोकांनी केल्यानंतरच समजणार आहे.पण गॅझेटमध्ये ट्राईब हा शब्द बंजारा समाजासाठी वापरलेले आसल्यामुळे आदिवासी प्रवर्गात समाविष्ट आहे,व याचा आधार घेऊन हा समाज आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत.
हैदराबाद गॅझेट हा निझामांच्या राज्यकालीन दस्तऐवजांचा भाग आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नाने मराठा समाजाला या गॅझेटचा उपयोग ओबीसी (कुणबी) दर्ज्याबाबत करण्यात आला आहे.हे गॅझेट १९१८ – १९२० मध्ये जारी केला असल्याचं नमूद आहे.या गॅझेटमध्ये मराठा कुणबी,कुणबी कुणबी, मराठा म्हणुन उल्लेख असल्यामुळे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे शासनाने जी आर काढले आहे मग,बंजारा समाजाच्या संदर्भानेही ट्राईब हा शब्द वापरलेला आहे.म्हणुन बंजारा/गोरमाटी समाजाला आदिवासी प्रवर्ग निश्चित करुन आम्हालाही न्याय द्या.
१९१८ साली किंवा त्यानंतर मागे पुढे जारी केलेला हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचे आदिवासी प्रवर्गात उल्लेख आहे? हैदराबाद गॅझेटनुसार बंजाराचा आदिवासी ट्राईब असा उल्लेख केलेला आहे.यामुळे बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश असल्याचा आमचा दावा आहे आणि शासनाने ते मान्य करावे हीच समाजाची विनंती आहे.
भारतातील सामाजिक संरचना ही विविध जाती,जमाती,पंथ व जीवनपद्धतींचा संगम आहे.या रचनेत काही समुदाय ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वंचित राहिले.अशा घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने विविध आरक्षण योजना व संवैधानिक उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे “अनुसूचित जमाती” (ST) प्रवर्ग.अलीकडच्या काळात अनेक वर्षापासून बंजारा समाजालाही एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या मागणीमागे केवळ राजकीय नव्हे तर ऐतिहासिक,सामाजिक व सांस्कृतिक अधिष्ठान आहे.हे सर्व जातीच्या समाज बांधवानी लक्षात घेतले पाहिजे.
बंजारा समाजाचा इतिहास आणि पारंपरिक जीवनपद्धती यांचा आगदी सारांश रुपात आढावा घेवू या.बंजारा समाज हा ऐतिहासिकदृष्ट्या एक घुमंतू/भटककी जमात आहे.
भारताच्या विविध भागांमध्ये त्यांना लमाणी,लंबाडी बंजारा,चारण सुगळी,गोर-बंजारा,गोरमाटी आशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.हे लोक पारंपरिकपणे व्यापारी (लदेणी ) व वाहतूकदार म्हणून काम करत.गाई बैलांच्या पाठीवर लादून ते धान्य,मीठ,मसाले,इतर वस्तू एका गावातून दुसऱ्या गावात नेत.त्यांची वस्ती ही प्रामुख्याने जंगलालगत,डोंगराळ व दूरच्या भागात असायची.
बंजार्यांचे पारंपरिक वस्त्र,नृत्य,लोकगीत,भाषा (गोरमाटी किंवा लमाणी), अंधश्रद्धा,सण-उत्सव व सामाजिक जीवनपद्धती यामध्ये अनुसूचित जमातींशी प्रचंड साम्य आहे.ते स्वतःचे वेगळे धार्मिक व सांस्कृतिक विश्व बाळगून आहेत,जे आदिवासी समाजासारखेच मुख्य प्रवाहापासून काहीसे वेगळे आहे.
मग बंजारा समाज आदिवासी आहे का ?
देशातील मुळ निवासी हे आजही प्रगत समाजापासून कोसो दूर राहतात घनदाट अरण्य, डोगरकपारी,दऱ्यात वस्तीकरून स्वतःची रूढी परंपरामूल्ये जपतात.बंजारा समाजही रानावनात राहातो.मग बंजारा समाज नेमका कोण ?गोरमाटी आणि आदिवासीयांच्या जीवनपद्धतीत बरेच साम्य आहे.एसटी समाज व बंजारा समाजातील साम्य कोण कोणत्या बाबीमध्ये आहे त्या विषयी चर्चा होणे आवश्यक आहे.
आदिवासी समाजाचे अभ्यासक,समाजशास्त्रज्ञ यांच्या मतानुसार
१ )आदिवासी समाज व बंजारा समाज हा मुख्य प्रवाहापासून दूर राहतो.
२ ) विशिष्ट प्रदेशातच वस्ती करुन राहतात.उदा खासी,गारो,नायर, तोडा,अंध,प्रधान.
३) दोन्ही समाज स्वतःची रुढी परंपरा चालीरिती यांची ते जीवापाड काळजी घेतात, जपतात.
४) बंजारा व आदिवासी लोक मुख्य समाज प्रवाहात मिसळण्यास लाजतात,संकोच करतात.बंजारा व इतर आदिवासी समाजांमध्ये गटप्रमुख, पंचायत प्रणाली, देव-देवता यांचं स्थान, स्थानिक रूढी परंपरा यामध्ये साम्य आहे.
५ ) त्यांची स्वतःची एक भाषा असते.बोलीभाषा बंजारा समाजाची “गोरमाटी” किंवा “लमाणी” ही भाषा ही एक स्वतंत्र बोली आहे,जी इतर आदिवासी भाषांप्रमाणेच संस्कृत किंवा इतर प्रमुख भाषांपासून दूर आहे.अधुनिक भाषा प्रवाह पासून अधुनिक प्रगतीपासून ते स्वतःला दूर ठेवतात.
६ ) बंजारा व आदिवासीची देवदेवताही इतर समाजापासून वेगळी असतात.
७ ) आदिवासी व बंजारा समाज हा निसर्ग पुजक आहेत..निसर्गात घडणाऱ्या घडामोडीना ते चमत्कार मानतात.
८ ) दोन्ही समाजाचा अंधश्रध्दावर त्यांचा विश्वास असतो.दोन्ही समाज स्थानिक देवता यांची पूजा करतात.त्यांच्या धार्मिक आचारधर्मात फारसा ब्राह्मणवादी हस्तक्षेप नाही.
९ ) शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा दोन्ही समाजात आहे. बंजारा समाजातील शैक्षणिक प्रगतीचा दर खूपच कमी आहे.जसे की अनुसूचित जमातींच्या बाबतीत दिसते, त्याचप्रमाणे बंजार्यांमध्येही शिक्षण,आरोग्य, आणि रोजगाराच्या संधींचा अभाव आहे.बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामाविष्ट करण्याची गरज
१०) आदिवासी समाजात आदरातिथ्य रोमारोमात भिनलेला असतो.बंजारा समाजातही आदरातिथ्य आहे.
११) दोन्ही गटात जात पंचायत आहे.
यावरील बाबींचा जर आपण बारकाईने अभ्यास केल तर किंवा विचार केल तर असे दिसून येते की बंजारा समाज हा विशिष्ट प्रदेशात राहत नाही.बाकी सगळ्या बाबी बंजाराना लागू होतात. म्हणून बंजारा समाज एसटी प्रवर्गात बसतो म्हणून समाजाला एसटी प्रवर्गात आणलेच पाहिजे.दोन्ही समाज भटकंतीवर आधारित होते.पिढ्यानपिढ्या स्थायिक न होता रोजगाराच्या शोधात फिरत राहणं हे त्यांच्या संस्कृतीचा भाग होता.अनुसूचित जमातीच्या व्याख्येनुसार,स्थानिकता, पारंपरिक जीवनशैली,सामाजिक मागासलेपणा,वेगळी सांस्कृतिक ओळख हे सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करतो.
जर इतर राज्यांमध्ये उदा.आंध्रप्रदेश,तेलंगणा,एसटी (कर्नाटकात एससी )म्हणून मान्यता पावला आहे,समानता आणि न्याय म्हणून महाराष्ट्रातील बंजार्यांना एसटी म्हणून मान्यता नाकारणं अन्यायकारक ठरेल समान सामाजिक धोरणासाठी बंजाराला एसटी प्रवर्गात घेणे आवश्यक आहे कारण भारतात एकाच समाजाला वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी श्रेणी (OBC/ST) देणं म्हणजे राष्ट्रीय धोरणात विसंगती निर्माण करणं होय.त्यामुळे सर्वत्र एकसंधता यावी म्हणून बंजाराला एसटी प्रवर्गात घेणे हे योग्य ठरेल.
या मुळे बंजारा समाजाला विकासाच्या संधी प्राप्त होतील.एसटी प्रवर्गात समावेश झाल्यास बंजारा समाजाला शैक्षणिक आरक्षण,नोकरीत आरक्षण,आर्थिक अनुदान,आदिवासी कल्याण योजना यांचा लाभ होईल.व भौतिक जीवन सुधारण्यास मदत होईल.अधुनिक जगाबरोबर बंजारा समाज चालू लागेल.
बंजारा समाजाच्या या मागणीला काही बांधव विरोधी भूमिका घेतील आणि काही संभाव्य अडचणी निश्चितच निर्माण करणार आहेत.त्या येणाऱ्या आडचणीवर आपण एकी ठेवून मात करावी लागणार आहे.
राजकीय नेत्याचा राजकीय हितसंबंध यात आडचण ठरणार हे निश्चित आहे.काही गट असा युक्तिवाद करतील की यामुळे मूळ आदिवासींचा हक्क बळकावला जाईल.यामुळे सामाजिक स्पर्धा वाढेल,आरक्षणाच्या जागांवर बंजारा समाजाच्या प्रवेशामुळे इतर एसटी घटकांना स्पर्धा करावी लागेल.काही दिडशहाणे इतिहासकार दावा करतील की बंजारा समाजाने नेहमीच व्यापार व धंद्याशी संबंधित राहून इतर आदिवासींपेक्षा वेगळी सामाजिक स्थिती राखली आहे.त्यामुळे त्यांना एसटी प्रवर्गात प्रवेश नको.
परंतू बंजारा समाजाचा इतिहास, जीवनशैली,सामाजिक स्थिती आणि सांस्कृतिक ओळख या सर्व बाबींचा विचार करता,त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करणे योग्य ठरते.यामुळे सामाजिक समतेचा आदर्श सिद्ध होईल आणि या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल.
परंतु,मला वाटते आपल्याला यासाठी संपूर्ण संशोधन,ऐतिहासिक पुरावे,समाजशास्त्रीय अभ्यास व स्थानिक सहमती मिळवणे आवश्यक आहे.त्याशिवाय हा निर्णय घेतल्यास सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समाजसेवक,राजकीय नेता,बंजारा तरुण, विचारवंत,लेखक,डॉक्टर,वकिल,शिक्षक यांनी बंजाराचा संघर्ष इतिहास विसरू नका.बंजारा समाजाने आपल्या संघर्षमय इतिहासात अनेक अडचणींचा सामना करत आपली संस्कृती टिकवून ठेवली आहे.आता वेळ आली आहे की त्यांना घटक जमातींचा न्यायसंगत हक्क मिळावा. राजकीय नेत्यांनी केवळ पक्ष पाहू नये.पक्षापुढे लाचारी पत्करू नका.तुमच्या पक्षापेक्षा समाज मोठा आहे हे विसरू नका.समाजासाठी एक व्हा. संघर्ष करा.नाहीतर समाज तुम्हाला कधीच माफ कसणार नाही.
मराठा समाजासाठी शासनाने जो निर्णय घेतला,तोच निर्णय बंजारा समाजासाठी घ्यावा.समाजाला न्याय मिळवून द्या.समाजशास्त्रज्ञ,विचारवंत,राजकीय नेते,समाजसेवक,शिक्षक,लेखक मंडळी व जनतेने या विषयावर मोकळ्या मनाने आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.
जय बंजारा , जय गोर .
©®राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपुरी,नांदेड -६
९९२२६५२४०७ .

