मुखेड :(दादाराव आगलावे)
महर्षी वाल्मिकी हे वाल्मिकी रामायणाचे रचनाकार, अध्यकवी, संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या महाकाव्यातून मानवी जीवनातील सत्य, कर्तव्य, सहास यांचा परिचय होतो आणि आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक तत्वे घेता येतात. श्री गुरुगोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरु आहेत f. त्यांनी खालसा पंताची स्थापना करून समाजाला एकत्र केले. समाजाला न्याय मिळावा, समाजात एकता, समानता नांदावी आणि सबंध मानवी जातीचे कल्याण व्हावे. अशी शिकवण या महापुरुषांनी दिली. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. श्रीपती पवार यांनी व्यक्त केले.
शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महर्षी वाल्मीक ऋषी आणि गुरुगोविंद सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. श्रीपती पवार बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून
हेमंतकुमार घाटे, डॉ. वेदांत पुलागौर, कार्यक्रमाधिकारी प्रा. संजीव डोईबळे, डॉ.जी रमन्ना रेड्डी, डॉ. विजय गोरगीळे, डॉ. स्वानंद मुखेडकर, प्रा. डी. एम. वाडेकर, डॉ.कल्याणकर एस. बी.यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी डॉ. वेदांत पुल्लागोर म्हणाले की, महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे तशी ती समाज सुधारकांची ही भूमी आहे. वेगवेगळ्या राज्यात त्या त्या परिस्थितीनुसार समाज परिवर्तनासाठी, संबंध मानव जातीच्या कल्याणासाठी अनेक समाजसुधारक जन्माला आले. त्यांनी आपला समाज अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढला. त्यांना परिवर्तनासाठी प्रेरित केले. हे त्यांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.केशव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी डॉ. अश्विनी बावस्कर यांनी तर आभार डॉ. सुदाम फड यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

