मुखेड: (दादाराव आगलावे)
जि. प. प्राथमिक शाळा चौकी महाकाया येथील सहशिक्षक बळवंत डावकरे व बालाजी पाटील यांची बदली झाल्यामुळे ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौठा नगरीचे सरपंच शिवराज देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी श्री पानपट्टे, चौकीच्या प्रथम नागरिक वच्छलाबाई कदम, तंटामुक्ती अध्यक्ष राममामा राठोड,पोलीस पाटील शिवनंदाबाई सुर्यवंशी, माजी सरपंच संभाजी कहाळेकर, नामदेव पाटील कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नंदकुमार बेळे,ग्रामपंचायतचे सदस्य माधव कहाळेकर, माजी अध्यक्ष हनुमंत कदम,माजी सरपंच हौसाजी पाटील वडजे, प्रल्हादमामा पवार, प्रकाश सूर्यवंशी, पप्पू कदम, आनंदा कहाळेकर, राजेश्वर राठोड, वंदनाबाई वाघमारे, मंगलाबाई कदम, रेखाबाई कांबळे, मोतीराम सूर्यवंशी, राहुल वाघमारे, संतोष वाघमारे, माधवमामा बेळे, निखिल राठोड, सुभाष राठोड, संतोष कदम, साईनाथ कदम, फुलूबाई पवार, भिमराव सुर्यवंशी, मनोहर सुर्यवंशी, अविनाश सुर्यवंशी शाळेतील नवीन शिक्षक वाघमारे व हळदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रम समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत कार्यालय, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला होता. निरोप घेताना उपक्रमशील शिक्षक बळवंत डावकरे म्हणाले की, हा निरोपाचा सोहळा पाहून मन अगदी भारावून गेले. मी व माझी पत्नी सौ. सुष्मा आम्हा दोघांचाही सपत्नीक वस्त्ररुपी जोडआहेर देऊन समस्त गावकऱ्यांच्या वतीने दिलेला निरोपाचा सन्मान आमच्या नेहमी स्मरणात राहील. मी व पाटीलसर आम्ही दोघे दुसऱ्या शाळेवरती रुजू झाल्यानंतरही गावकऱ्यांनी सुट्टीत आमचा सन्मान केला. यातूनच गावकऱ्यांच्या मनातील शिक्षणाची तळमळ व शिक्षकांविषयीची आपुलकी दिसून आली. प्रा. शा. चौकी महाकाया येथे कार्यरत असताना शाळेत अशिक्षित कुटुंबातीलच मुले जास्तीचे दिसून आली पण हळूहळू विद्यार्थ्यामध्ये मिसळत गेलो. बहुतांश बंजारा समाजाची मुले शाळेत असल्यामुळे त्यांची बोलीभाषा थोड्याफार प्रमाणात मला कळत होती. मी पण तोडक्या मोडक्या बंजारा भाषेत त्यांच्याशी संवाद साधू लागलो व त्यातून जवळीकता निर्माण झाली. शाळेला लागणाऱ्या भौतिक सुविधाबाबत तत्कालीन सरपंच हौसाजी पाटील यांनी भरपूर मदत केली, ते एकच म्हणायचे की गुरुजी काय लागेल ते मागा पण लेकरं हुशार बनवा. यातूनच आम्हाला प्रेरणा मिळत गेली व लेकरे घडत गेली. पितृतुल्य व्यक्तीमत्व स्व.रावण पाटील यांनी पण शाळेला वेळोवेळी सहकार्य केले. अध्यक्ष हणमंत पाटील आमच्या हक्काचा दुवा. किशन कांबळे, मधुकर बेळे, प्रल्हाद पवार,मोतीराम मामा, राम राठोड, बळीमामा, अशोक पाटील, संभामामा, ज्यांच्या घरी जाऊन दुरडीतील भाकर खायचो असे इरवंतमामा, उषाबाई, शाहुमाय, जिजामाय, फुलुबाई, वंदनाबाई, आनंदा कहाळेकर, भास्कर पवार, धम्मा, राहूल, माधव मामा बेळे, मारोती पाटील, नामदेव पाटील, माधव कहाळेकर, मोतीराम सुर्यवंशी, शिवनंदाबाई, गुंडेरावमामा भिमरावमामा, नंदू बेळे, सुनील पाटील, व्यंकट पाटील, सुधाकर पवार, सुभाष राठोड, प्रकाश गुरुजी, अरुण गुरुजी, व्यंकट राठोड, देविदास पवार, देविदास वाघमारे, सुनील वाघमारे, स्व.भागवत वाघमारे यासह सर्वच गावकरी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला व सहकार्य केले ते निश्चित अभिमानास्पद होते. कदम, वडजे, बेळे, पाटील, राठोड, पवार, चव्हाण, सुर्यवंशी, कहाळेकर, वाघमारे, कांबळे, सोनकांबळे, रेडे या सर्वानी आम्हाला अनमोल अशी माया लावली हे आम्ही कदापि विसरणार नाही. असे यावेळी बळवंत डावकरे यांनी भावपूर्ण गौरवोद्गार काढले.डावकरे पुढे म्हणाले की, माझे सहकारी बालाजी पाटील सर अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे. काल आम्ही जाणार म्हटल्यानंतर त्यांच्या व आमच्याही डोळ्यात अश्रू आले. हे चेहरे कधीही डोळ्यापुढून हटणार नाहीत.आपल्या गावची गंभीर समस्या म्हणजे दिवाळीनंतर होणारे स्थलांतर.अर्धी मुले पालकांसोबत ऊसतोडणीसाठी जायची. पण यावर सर्वांशी चर्चा करुन बऱ्याच अंशी स्थलांतर रोखण्यात यश मिळवले.
त्याना लागणारे लेखन साहित्य आम्ही स्वखर्चाने उपलब्ध करुन दिले.३८ पटसंख्येवरुन शाळेचा पट सर्वांच्या सहकार्याने ५४ पर्यंत नेता आला याचे मनस्वी समाधान वाटते. प्रशासनाने नेहमीच आपल्या शाळेला सर्वोतोपरी मदत केली.विशेषतः केंद्रप्रमुख संतोष दिनकर सर, गटशिक्षणाधिकारी संजय येरमे साहेब यांचे सहकार्य बहुमोल होते. आज प्रशासकीय बदलीने ७ वर्षाचा आलेला स्नेह सोडून जाताना कंठ दाटून येतो. आमच्या शाळेतील स्वंयपाकी मंगलमावशी, मदतनीस अहिल्याबाई, रेखाबाई यांनी अतिशय मनलावून व मेहनतीने, आपुलकीने शाळेला मदत केली, शाळेची कामे केली ते आमच्या सदैव आठवणीत राहतील. यावेळी अनेक विद्यार्थी, ग्रामस्थ व प्रमुखातिथीचे मनोगत संपन्न झाले. निरोपाचा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी उंचीवर येऊन ठेपला होता. असा निरोप काहीच्याच नशिबी असतो अशीही चर्चा कार्यक्रमस्थळी ऐकवयास मिळाली.

