धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे)
तरूणामध्ये उत्साह आणि विवेकाचा मिलाफ असल्याने समाज मोठ्या अपेक्षेने पाहतोय. असे उद्गार संत साहित्याचे अभ्यासक तथा परिवर्तनवादी कीर्तनकार हरिदास तम्मेवार यानी दिपावली निमित्त आयोजित डोणे परिवार स्नेह मेळावा कार्यक्रमात काढले.
यावेळी विचार मंचावर अध्यक्ष गणपतराव डोणे, प्रमुख वक्ते हरिदास तम्मेवार, प्रमुख पाहुणे डॉ. सुरेश वाघमारे, दत्तात्रय डोणे, सामाजिक कार्यकर्ते बाबा हलकुडे आदी मान्यवर होते.
ते पुढे म्हणाले की नाते संबंधांवर संस्कृतीचा डोलारा उभा आहे. म्हणून नाते संबंध टिकले पाहिजेत. अशा परिवार स्नेह मेळाव्यातून ते टिकू शकते. आई- वडील व मुलातील अंतर वरचेवर वाढत जात आहे. त्याना पैशाच्या मदतीपेक्षा वेळ काढून जवळ येऊन आपुलकीने चार शब्द बोलण्याची गरज आहे. किर्तनाची परंपरा संत जनाबाईने निर्माण केल्या. गितेमध्ये योध्द्याचा धर्म सांगितला गेला आहे. पालकांनी आपल्या मुलांना स्वाभिमान शिकवावा. स्वतःमधील शिकणे कधीही मरू देऊ नका. प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुरेश वाघमारे म्हणाले की समाजातील विचाराचा अंधार दिसून येतोय त्यास घालवण्यासाठी ज्ञानदीप प्रज्वलित करायलाच हवे. भाऊबीज हे कर्मकांड नसून कुटुंबातील ऐक्य टिकवण्यासाठीचा सण आहे. परिवार ओझे नसून प्रेमाचे प्रतीक आहे. कुटूंबातून बाहेरील जगात जगण्याची प्रेरणा घेतली पाहिजे. विभक्त राहिल्याने माणसातील मायेचा ओलावा कमी झाला आहे. अशा कार्यक्रमातून वाढू शकतो. प्रथमतः डोणे परिवाराच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्याचा परिचय बाबा हलकुडे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुरलीधर डोणे यांनी केले तर आभार लक्ष्मण डोणे यांनी मानले.
या प्रसंगी कला पंढरीचे प्रमुख बी. पी. सुर्यवंशी, गणपती डोणे, प्रल्हाद डोणे, सुधाकर डोणे, मंचकराव डोणे, संतोष डोणे, हरिभाऊ डोणे, अमोल डोणे, प्रकाश डोणे, शिवाजी डोणे, अतुल डोणे, मुली, जावई, सुना, नातू व मित्र परिवार होता.

