आजच्या लेखांमध्ये अठरा आलूतेदार व बारा बलुतेदार या दिनरात्र काबाडकष्ट करणाऱ्या श्रमजीवींची माहिती अभ्यासाची आहे.शेतकरी,कामगार,शेतमजूर,पडेल ते काम करणारे कष्टकरी यांच्या परिश्रमावर आधारलेला विशिष्ट वर्ग मोठ्या थाटामाटात व ऐषारामी जीवन जगत असतो.
बहुजन समाज हा परिश्रम करून घाम गाळणारा वर्ग आहे. रात्रंदिवस कष्टाचे काम तो करतो. पायपीट करून आपल्या जनावरांना,शेळ्या,मेंढ्यांना राखून त्यांचे दूध शहरापर्यंत पोहोचतो.
आपल्या देशाशी,राष्ट्रशी,इमान इतबारे प्रामाणिकपणे जीवन जगतो.म्हणून बहुजन समाजाचे सौंदर्य हे त्यांच्या परिश्रमा मध्ये खुलून दिसते. असे या ठिकाणी ठामपणे आपणाला सांगायचं आहे.आज या बहुजन समाजाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.जो तो या समाजाला कसं लूबाडता व फसवता येईल, यासाठी टपून बसला आहे.त्याच्या कष्टाचं मूल्य त्यांना मिळत नाही. आज शेतीची अवस्था असून नसल्यासारखी झाली आहे.
बी- बियाणे,खते यांचे भाव गगनाला भिडले आहेत. आणि शेतकऱ्यांच्या हातात पीक आल्यानंतर त्याचे भाव दलाल व व्यावसायिक ठरवतात.
शेतकरी हा दिवस-रात्र शेतात राबवून आपल्याला ज्वारी,धन धान्य पिकवून देतो, कष्टकरी लोक दिवस-रात्र उभे राहून आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक असतात. त्यांच्या कामा मधूनच त्यांच सौंदर्य शास्त्र खुलून दिसते.
तळ हातावरील रेषा पेक्षा आणि गळ्यातील मोत्याच्या हारा पेक्षा श्रमजीवींच्या कपाळावरील घामाच्या धारा त्यांना जास्त शोभून दिसतात. म्हणूनच आम्ही कष्टाचे खातो असे शेतकरी मोठ्या अभिमानाने म्हणतो.याच्या उलट आता अनेक लबाड लोक या समाजात वावरताना दिसत आहेत. गोरगरिबांच्या कष्टातून घामातून पिकविलेल्या वस्तूवर सुद्धा वेगवेगळ्या जाचक कर लावून पैसे काढून घेत आहेत.त्यांच्या घामाच त्यांना काही घेणे-देणे नाही.
आज बाजारात असे दलाल निर्माण झाले आहेत. बहुजन समाजावर तुटून पडत आहेत. काही चतुर लोक काल्पनिक कथा सांगून लोकांना भ्रमिष्ट करत आहेत. स्वर्ग नरकाच्या गोष्टी सांगितल्या जातात. काही आतल्या गाठीचे लोक बरोबर बहुजन समाजाचा फायदा करून घेत आहेत.श्रीमंत लोक हे कधीही गरीबाची बाजू घेत नाहीत “श्रीमंतांचा आला गाडा गरीबांची झोपडी काढा”अशी म्हण आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील ‘सावकार’ हा बहुजन समाजाचे रक्त पितो. बरोबर अडचणीचा फायदा घेऊन वाईट नजर ठेवून कसा माल लंपास करता येईल. याची तो वाट पाहत असतो. कधी कधी तो कुटुंबातील व्यक्तीकडे त्यांची वाईट नजर जाते. भांडवलदार लोकांना बहुजनांचे परिश्रम दिसत नाहीत.फक्त पिळवणूक कशी करता येईल. याकडे त्याचे बारीक लक्ष असते. बहुजन समाजाने प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त धनधाडग्यांना मतदान करावं
.त्यांच्या तालावर नाचांव, आणि गुपचूप बसावे. तोंड उघडल्यास दमदाटी करून तोंड बंद केलं जाते. शतकानुशतके असं चालत आले आहे. परंतु आता यापुढे खपवून घेतलं जाणार नाही.ज्याची जागा त्याला दाखवली जाईल.परिश्रमा तून व आपल्या परिवर्तनवादी विचारांतून सध्या शक्य झाले आहे. कोण आमची लूबाडणूक करत आहे.हे आता प्रत्येक व्यक्तीला कळत आहे.कारण सध्या घरातील सगळेच व्यक्ती सुशिक्षित झाले आहेत.अशिक्षित लोकांना चुकीचे मार्गदर्शन करून फसवले जात होते,परंतु आता हे शक्य नाही. म्हणून बहुजन समाजाने आपल्या आपल्या पद्धतीने जीवन जगावे कोणाच्याही ताटा खालचे मांजर होऊ नये. आणि आपला मार्गदर्शक म्हणून कोणालाही समजू नये. शिक्षणाकडे वळावे. संघटित व्हावे आणि नंतर संघर्ष करावा. जितके तुम्ही शिक्षण शिकाल तेवढे तुमचा फायदा होईल. कारण तुम्हांला सत्य/ असत्य सर्व काही कळते.
त्यामुळे तुम्हाला फसवण्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. आपल्या फायद्यासाठी लोक बोलत आहेत. बहुजन समाजातील एखादा व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावर खेड्यातून येऊन शहरात राहून भरपूर परिश्रम करून संपादक.लेखक कवी, वकील
न्यायाधीश,तहसिलदार, जिल्हाधिकारी किंवा आमदार ,
खासदार अशा मोठ्या पदापर्यंत पोहोचल्यास अनेकांना वाईट वाटते. पोटात दुखू लागते, मळमळ वाढते .काही लोकांचे चेहरे काळवंडतात, बहुजन समाज शिकला तर आपल्या त्यांचे ऐकून घेण्याची वेळ येईल. म्हणून ते आपल्याला इतर मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतात.
यापासून सावधान रहावे.त्यामुळे बहुजन समाजाने आतापासूनच हुशार व्हावे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.
कोणतेही आमिष स्वीकारू नयेत. कोणी आपल्याला कमी समजून काही बोलत असेल तर ऐकून घेऊ नये.स्वाभिमान आपला शाबूत राहावा.कारण आपण कष्टकरी आहोत. इतरांनी आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही. इतर लोक फक्त आपला फायदा करून घेतात. महत्त्वाच्या वेळेला आपल्याला बाजूला करतात. कडीपत्ता चिवड्यातून बाहेर काढला जातो. तसं आपला वापर करून घेतात म्हणून श्रमिकांनो एकजुटीने रहा. एकजूट कधीही आपणाला यश मिळवून देते. कामगारांनी काम केल्यानंतर कंपनी मोठी होते.याची जाणीव भांडवलदारांनी ठेवावी. म्हणून श्रमिकांचे सौंदर्यशास्त्र परिश्रमा मध्येच आहे. हे या ठिकाणी सांगता येते.‘समुपदेशक’
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव
अध्यक्ष: विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

