प्रतिनिधी, कंधार
————–
त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त माता रमाई विचारमंच आणि माता रमाई जयंती मंडळ, जवळा दे ता.लोहा जि.नांदेड यांच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मातांना देण्यात येणारा माता रमाई गणगोत पुरस्कार कंधार येथील सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाबाई त्र्यंबक कांबळे यांना जाहीर झाला आहे.
दरवर्षी त्यागमूर्ती माता रमाई जयंतीनिमित्त माता रमाई विचारमंच आणि माता रमाई जयंती मंडळ, जवळा दे ता.लोहा जि.नांदेड यांच्या वतीने दिले जाणारे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा विविध क्षेत्रातील ७ कर्तृत्ववान मातांना हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. कंधार येथील ख्यातनाम #पत्रकार राजेश्वर कांबळे यांच्या मातोश्री निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक, शाल, पुष्पहार, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यागमूर्ती माता रमाई जयंतीदिनी शनिवारी, दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जवळा दे ता.लोहा येथे जि.नांदेड येथे निर्मलाबाई कांबळे यांना माता रमाई गणगोत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
निर्मलाबाई कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही त्या पती आणि मुले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. शिक्षण नसतानाही त्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आपल्या मुलांना उच्च शिक्षित केलं. त्यांना अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी सापडली होती. त्यांनी ती अंगठी प्रामाणिकपणे परत केली. या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित येणार आहे. निर्मलाबाई कांबळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

